• Download App
    उत्तराखंड, गुजरातचे मुख्यमंत्री बदलले भाजपने; स्वतःकडे श्रेय घेतले आम आदमी पार्टीने...!! |BJP changes Uttarakhand, Gujarat CM; The Aam Aadmi Party took credit for itself title% | The Focus India

    उत्तराखंड, गुजरातचे मुख्यमंत्री बदलले भाजपने; स्वतःकडे श्रेय घेतले आम आदमी पार्टीने…!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच त्यांच्या राजीनाम्या विषयी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यातली सगळ्यात अजब प्रतिक्रिया आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे.BJP changes Uttarakhand, Gujarat CM; The Aam Aadmi Party took credit for itself

    ज्या ज्या राज्यांमध्ये आम आदमी पार्टीने राजकारणात प्रवेश केला आहे तिथे भाजपने मुख्यमंत्री बदलल्याचा अजब दावा आम आदमी पार्टीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून केला आहे.



    उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीने प्रवेश केला. मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागला. आता गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने प्रवेश केला आहे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे, असे ट्विट आम आदमी पार्टी ने केले आहे.

    जणू काही आम आदमी पार्टीने उत्तराखंड आणि गुजरातची विधानसभेची निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला आहे. वास्तविक गुजरात मध्ये फक्त सूरत महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसला मागे टाकून विरोधी पक्षनेते पद मिळवले आहे. तेथे त्यांचे 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. पण एवढ्यानेच आपली राजकीय ताकद गुजरातमध्ये प्रचंड वाढल्याचा आव आम आदमी पार्टीने आणला आहे.

    उत्तराखंडात कोणत्याही निवडणुकीत आम आदमी पार्टीने अद्याप तरी फार मोठा तीर मारलेला नाही. तरी देखील आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःच्याच ट्विटर हॅण्डलवर ट्विट करून ओढून घेतले आहे.

    BJP changes Uttarakhand, Gujarat CM; The Aam Aadmi Party took credit for itself

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार