BJP Answer To Munawwar Rana : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री झाले तर राज्य सोडून देण्याचे विधान केले होते. यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, मुनव्वर राणा यांनी आता दुसरे एक शहर किंवा राज्य शोधायला हवे, कारण 2022 मध्ये योगीच पुन्हा येणार आहेत. त्रिपाठी म्हणाले, राणा राजकारणाला धार्मिक रंग देण्याचे काम करत आहेत. bjp answer to munawwar rana you should find another place yogi is coming again
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री झाले तर राज्य सोडून देण्याचे विधान केले होते. यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, मुनव्वर राणा यांनी आता दुसरे एक शहर किंवा राज्य शोधायला हवे, कारण 2022 मध्ये योगीच पुन्हा येणार आहेत. त्रिपाठी म्हणाले, राणा राजकारणाला धार्मिक रंग देण्याचे काम करत आहेत.
मुनव्वर राणा यांनी नुकतेच म्हटले होते की, जर योगी आदित्यनाथ पुन्हा यूपीमध्ये मुख्यमंत्री झाले तर मी राज्य सोडून देईन आणि हे राज्य मुस्लिमांना राहण्यास योग्य नाही हेही मी मान्य करेन. यूपीमध्ये ओवैसी यांच्या पक्षाने निवडणूक लढवण्यावर मुनव्वर राणा म्हणाले की, भाजप आणि एआयएमआयएम हे दोन्ही पक्ष केवळ दाखवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. दोघांनाही धार्मिक आधारावर राज्यातील मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे.
नव्या लोकसंख्या धोरणावर टीका
उत्तर प्रदेशच्या नवीन लोकसंख्या धोरणाबद्दल राणा यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, जर मुख्यमंत्री योगी विवाहित असते, तर त्यांनी लोकसंख्या कायदा आणण्यापूर्वी विचार केला असता.
यूपी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न
मुनव्वर राणा म्हणाले, चकमकीत मुस्लिम मुले ठार मारली जात आहेत. अल कायदाच्या नावावर बनावट प्रकरणे बनत आहेत. यूपीमधील मुस्लिमच जर कायद्याने जगू शकलत नाहीत तर अल कायदा काय जगेल? एवढेच नव्हे तर ते म्हणाले, मी गुप्तहेर एजन्सीवरही प्रश्न उपस्थित करतो की निरपराध लोकांना का अडचणीत आणले जाते. घरातून कुकर उचलून त्याला बॉम्ब म्हटलं जात आहे.
ओवैसींना मुस्लिम मतदान करणार नाहीत
मुनव्वर राणा म्हणाले, ओवैसी यांच्या पक्षाने निवडणुका लढवून केवळ भाजपला फायदा होईल. ते म्हणाले की, जर उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजात काही बुद्धिमत्ता असेल तर ते ओवैसी यांना मतदान करणार नाहीत. कशाही तऱ्हेने मुस्लिमांना त्रास देणे हे भाजपा सरकारचे एकमेव काम आहे. धर्मांतर कायदा असो वा लोकसंख्या नियंत्रण कायदा असो किंवा दहशतवादाच्या नावाखाली अटक असो.
bjp answer to munawwar rana you should find another place yogi is coming again
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचे मोठे संकेत, म्हणाल्या- आघाडीला नकार नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ!
- काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, माहिती देणाऱ्यास एमपी पोलिसांकडून 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर
- ओवैसींचा पक्ष AIMIM चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने लावला एलन मस्कचा फोटो !
- यूपीमध्ये ब्राह्मण संमेलने भरवून मायावतींचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न, 2007ची पुनरावृत्ती होईल?
- अधीर रंजन बनणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते, वाचा सविस्तर… संसदेत आता काँग्रेसने कुणाला कोणती जबाबदारी दिली!