पीएम मोदींनी लिहिले, ‘आरोग्य पायाभूत सुविधांच्या सुधारणासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे आणि भारत या दिशेने कठोर परिश्रम घेत आहे.’Bill Gates praises ‘Ayushman Bharat Digital Health Mission’, PM Modi expresses gratitude
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशन’ सुरू केले.याद्वारे आरोग्य सेवा डिजिटल केल्या जातील.या मोहिमेअंतर्गत, भारतीयांचा युनिक हेल्थ आयडी तयार केला जाईल.भारताच्या या मिशनचे अमेरिकन अब्जाधीश बिल गेट्स यांनीही कौतुक केले आहे.
त्यांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले, ज्यावर पीएम मोदींनीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे कौतुक करताना बिल गेट्सने पीएम मोदींचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करताना लिहिले, ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या शुभारंभाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन. हे डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा सर्वांसाठी आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यात आणि भारताची आरोग्य ध्येये साध्य करण्याच्या दिशेने प्रगती करण्यास मदत करेल.
पीएम मोदींनी बिल गेट्स यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांचे आभारही मानले.पीएम मोदींनी लिहिले, ‘आरोग्य पायाभूत सुविधांच्या सुधारणासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची प्रचंड क्षमता आहे आणि भारत या दिशेने कठोर परिश्रम घेत आहे.’ यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये बिल गेट्स यांनी आयुषमान भारत योजनेचे कौतुक केले होते. आयुष्मान भारत योजनेचे १०० दिवस पूर्ण झाल्यावर गेट्स यांनी हे ट्विट केले.
त्या वेळी, सरकारी आकडेवारीमध्ये असे उघड झाले की १००दिवसात ६.८५ लाखांहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यावर बिल गेट्स यांनी स्तुती केली आणि म्हणाले की ‘१००दिवसात इतक्या लोकांना लाभ मिळाला हे पाहून खूप आनंद झाला’. आयुष्मान भारत योजना सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली.
Bill Gates praises ‘Ayushman Bharat Digital Health Mission’, PM Modi expresses gratitude
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल २५ वर्षानंतर तामीळनाडूच्या महिला मंत्र्याला भ्रष्टाचाराचा आरोपावरून पाच वर्षे शिक्षा
- हिंदूत्व सर्वांना बरोबर घेऊन चालते, समान संस्कृती असलेला समाज एक राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- धर्मांतर प्रकरणातील आयएएस अधिकाऱ्याला असुद्दीन ओवेसी यांचा पाठिंबा, धर्माच्या नावाखाली छळवणूक होत असल्याचा आरोप
- परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील दोघांची जामीनावर सुटका ; राज्य सरकारला दणका