• Download App
    भारत-चीन संबंधात सध्या मोठ्या बॅडपॅचचा काळ - परराष्ट्रमंत्री जयशंकर । Big bdpatch in India china relations

    भारत-चीन संबंधात सध्या मोठ्या बॅडपॅचचा काळ – परराष्ट्रमंत्री जयशंकर

    वृत्तसंस्था

    सिंगापूर : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सध्या ‘बॅडपॅच’ मधून जात असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. कारण कराराचे उल्लंघन करत चीनने सीमेवर आक्षेपार्ह घडामोडी केल्या असून याबाबत चीनकडून ठोस स्पष्टीकरण आले नसल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. ब्लूमबर्ग न्यू इकोर्नामिक फोरमध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. Big bdpatch in India china relations



    भारताशी असलेल्या संबंधावरून चीनच्या मनात गोंधळ असेल, असे वाटत नाही. आपण नेहमीच स्पष्ट बोलतो आणि त्यांना भारताचे म्हणणे ऐकायचे असेल तर त्यांनी आतापर्यंत माझे म्हणणे ऐकले असेल, असेही जयशंकर म्हणाले.

    भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेला न्यायचे आहेत, याबाबत चीनच्या नेतृत्वाने खुलासा करावा, अशीही अपेक्षा परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली.

    Big bdpatch in India china relations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला

    Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन