• Download App
    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, ‘’कर्नाटक निवडणुकीच्या निकालात आश्चर्यकारक काहीही नाही’’ Assam Chief Minister Himanta Biswa Sarma says There is nothing surprising in the Karnataka election results

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, ‘’कर्नाटक निवडणुकीच्या निकालात आश्चर्यकारक काहीही नाही’’

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा  विजय मिळवला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : ईशान्येकडील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, कर्नाटकातील काँग्रेसचा विजय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सलग तिसऱ्या विजयाच्या मार्गात येणार नाही. Assam Chief Minister Himanta Biswa Sarma says There is nothing surprising in the Karnataka election results

    याचबरोबर ते म्हणाले की ‘’कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण भाजपाने २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यापूर्वीही ते कर्नाटकात सत्तेत होते.’’

    कर्नाटक निवडणुकीत भाजपाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करणारे सरमा म्हणाले की, राज्यात पक्षाने चांगली कामगिरी केली नाही, परंतु सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येणाऱ्या भाजपच्या मार्गात ते येणार नाही. आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील बिहागुरी येथे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “विरोधक हा विजय बुडत्याला काडीचा आधार म्हणून घेत आहेत, परंतु भविष्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.”

    याशिवाय मात्र, सरमा यांनी पत्रकारांना सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भेट दिलेल्या बहुतांश मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे.

    Assam Chief Minister Himanta Biswa Sarma says There is nothing surprising in the Karnataka election results

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!