• Download App
    बेळगाववर भगवा फडकला, राऊत खरे बोलले... पण शिवसेना हिंदुत्वापासून ढळलीय त्याचे काय...??; आशिश शेलारांचा बोचरा सवाल Ashish Shelar's question

    बेळगाववर भगवा फडकला, राऊत खरे बोलले… पण शिवसेना हिंदुत्वापासून ढळलीय त्याचे काय…??; आशिश शेलारांचा बोचरा सवाल

    प्रतिनिधी

    मुंबई – बेळगाववर भगवा फडकेल, असे संजय राऊत म्हणाले होते. ते खरेच बोलले होते. पण भगवा भाजपचा फडकलाय… शिवसेना हिंदुत्वापासून दूरच गेलीय, अशी बोचली टीका भाजपचे नेते आमदार आशिश शेलार यांनी केली आहे. Ashish Shelar’s question

    बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीकाटिप्पणी तर केलीच शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांना शेलक्या शब्दांत टोलाही लगावला आहे.

    पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले, की बेळगावचे नेते, जनता आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या निवडणूकीत भगवा फडकेल असे शिवसेनेचे नेते संजय राऊत अगोदर बोलले होते. ते खरेच बोलले असेच मी म्हणेन. कारण खरा भगवा भाजपाकडेच आहे हे आता स्पष्ट झालेय. एवढीच प्रतिक्रिया देईन”.

    सामन्यातल्या अग्रलेखात हिंदुत्वाविषयी केलेल्या भाष्याबद्दल विचारले असता आशिश शेलार म्हणाले, की मी आत्ताच म्हणालो की संजय राऊत हळुहळू खरे बोलायला लागले आहेत.



    पण कधी कधी आपल्या मित्रपक्षांच्या मालकांना खूश करायला थोडा यूटर्न घेतात. आणि त्या यूटर्नमध्ये शिवसेना आता हिंदुत्वापासून सरकलीय हे लपवण्याचा अतिशय आटोकाट प्रयत्न करतात.

    पण टिपू सुलतान जयंतीपासून बेहराम पाड्यात जिंकण्यापर्यंत, गोविंदांवर केसेस टाकण्यापासून गणेशोत्सव आणि मंदिरांच्या बंदीपर्यंत जे काही राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला अपेक्षित आहे तेच शिवसेना करतेय आणि म्हणून आपल्या हातातून भगवा निसटलाय हे जाणवल्यानंतर ते हिंदुत्वावर बोलायला लागतेल. पण त्यांचा शिवसेनेचे हिंदुत्व दाखविण्याचा प्रयत्न वायफळ आहे.

    Ashish Shelar’s question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला