• Download App
    एअर इंडियाची विक्रमी झेप; अमेरिका आणि फ्रान्सकडून खरेदी करणार एकूण ८४० विमाने!! Air India's Vikrami Zep; A total of 840 aircraft will be bought from America and France

    एअर इंडियाची विक्रमी झेप; अमेरिका आणि फ्रान्सकडून खरेदी करणार एकूण ८४० विमाने!!

    प्रतिनिधी

    मुंबई : टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया कंपनी अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून एकूण ८४० विमाने खरेदी करणार आहे. दोन दिवसांपूर्वीच यासंबंधीचा करार करण्यात आला आहे. सुरुवातीला ४७० विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा आणखी ३७० विमाने घेणार असल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी निपुण अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. Air India’s Vikrami Zep; A total of 840 aircraft will be bought from America and France

    हवाई क्षेत्रातील मोठा करार 

    एअर इंडियाचे वरिष्ठ वाणिजिक्य आणि रुपांतरण विभागाचे अधिकारी निपुण अग्रवाल यांनी बुधवारी लिंक्डिनवर लिहिलेल्या एका पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. तसेच एअर इंडियाच्या करारानंतर भारत आणि जगभरात या कराराचे कौतुक केले गेले, लोकांचे हे प्रेम आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असेही अग्रवाल म्हणाले.



    एअर इंडियाने मंगळवारी फ्रान्सच्या एअरबसकडून २५०, तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने घेणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातलला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असा हा करार आहे. आता निपुण अग्रवाल यांनी सूचित केल्याप्रमाणे हा करार आणखी मोठा होणार आहे. कारण या ४७० विमानांच्या खरेदीमध्ये आणखी ३७० विमानांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण खरेदी करण्यात येणाऱ्या विमानांची संख्या ८४० होणार आहे. जुन्या करारानुसार जे ४७० विमाने घेतली जाणार होती, त्यामध्ये पुढच्या दशकापर्यंत ३७० विमानांची वाढ करण्यात येणार आहे.

    Air India’s Vikrami Zep; A total of 840 aircraft will be bought from America and France

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील