वृत्तसंस्था
मुजफ्फरनगर: कृषी कायद्यावरून भारतीय किसान यूनियनमध्ये आता दुफळी निर्माण झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष भानु प्रताप सिंह आणि प्रवक्ते राकेश टीकैत यांनी कायद्याबाबत परस्पर विरोधी मते व्यक्त केली आहेत. सिंह यांनी कायदे लागू करण्यास हरकत नाही, असे स्पष्ट केले. तर टिकैत यांनी आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम असल्याचे सांगितले. Agricultural laws are good: Statement of Bhanu Pratap Singh, President of Indian Farmers Union; Rakesh Tikait Is not Authentic
केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे उत्तम असून भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टीकैत प्रामाणिक नाहीत. ते दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनातून दहशतवाद पसरत असल्याचा आरोप भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी केला.
केंद्राच्या कृषी कायद्याला ४० संघटना विरोध करत आहेत. त्या बाबत ते म्हणाले, आम्ही शेतकरी हितासाठी कृषी आयोगाची मागणी करत आहोत.नवे कृषी कायदे लागू करण्यासाठी आमची कोणतीही हरकत नाही. पण, आम्हाला कृषी आयोग हवा. त्यासाठी शेतकरी नेते सरकारशी चर्चा करतील.
टिकैत यांचा सरकारवर हल्लाबोल
भारतीय किसान यूनियनमधील मतभेदाकडे दुर्लक्ष करताना टिकैत यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. सरकरने किमान आधारभूत किंमतीवर कायदा बनवावा. सरकारने शेतकरी आंदोलनाचा हिसका बघितला आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. आंदोलन सुरूच राहणार आहे.
Agricultural laws are good: Statement of Bhanu Pratap Singh, President of Indian Farmers Union; Rakesh Tikait Is not Authentic
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध