विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांतील कॉँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता गांधीनिष्ठ म्हणविले जाणारे खासदार शशी थरुर यांनीही आता संघटनात्मक नेृत्वात सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हणत पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे.After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership
थरुर यांनी म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की आयडिया ऑफ इंडियासाठी काँग्रेसने उभा राहून देशासाठी कार्यक्रम द्यावा. तसेच आमच्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल बदल टाळू शकत नाही.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची मागणी पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी केलीशशी थरुर यांना कॉँग्रेसच्या जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.
या निकालामुळे दु:खी असून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची झपाट्याने पिछेहाट होत आहे. जी-२३ नेत्यांची पुढील ४८ तासांमध्ये बैठक होईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership
महत्त्वाच्या बातम्या
- U. P. Elections Modi : घराणेशाही मोडणारच; केंद्रीय तपास संस्थांचे बुलडोझर महाराष्ट्रात घुसणार!!; पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा अर्थ!!
- आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुण्यात आनंदोत्सव
- UP Elections Modi : लिहून घ्या, राजकीय घराणेशाही जनता मोडून काढेलच; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!
- UP Elections Modi : घराणेशाहीचा भ्रष्टाचार मोडणारच; केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचे पंतप्रधान मोदींकडून समर्थन!!