22 jawans martyred in Naxal attack : नक्षलग्रस्त विजापूर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 22 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी बस्तर भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर काही सैनिक बेपत्ता होते, पण शोधमोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणी आणखी मृतदेह सापडले. यानंतर एकूण 22 जवान शहीद झाल्याची माहिती बिजनौरच्या एसपींनी दिली. दुसरीकडे, 30 जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 22 jawans martyred in Naxal attack in Bijapur Chhattisgarh, search operation continues
वृत्तसंस्था
विजापूर : नक्षलग्रस्त विजापूर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 22 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी बस्तर भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर काही सैनिक बेपत्ता होते, पण शोधमोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणी आणखी मृतदेह सापडले. यानंतर एकूण 22 जवान शहीद झाल्याची माहिती बिजनौरच्या एसपींनी दिली. दुसरीकडे, 30 जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वृत्तसंस्था एएनआयनुसार छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 21 जवान बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू होता. पोलिस दलाने सांगितले होते की, सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चकमकीत नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास बस्तर परिसरातील जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांची पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी (पीएलजीए) बटालियन आणि तारिमच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. ही चकमक तीन तासांहून अधिक काळ चालली. यात कोब्रा बटालियनचा एक जवान, बस्तरिया बटालियनचे दोन जवान आणि डीआरजीचे दोन जवान (एकूण पाच जवान) ठार झाल्याचे पाल यांनी सांगितले होते. यावेळी 30 जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जवानांना रायपूरच्या रुग्णालयात आणि 23 जवानांना विजापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादी हल्ल्यात शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी म्हणाले की, सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही. ट्वीटमध्ये पीएम मोदींनी लिहिले की, “छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना आहेत.” शूर हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना.”
गृहमंत्री शहा यांनी व्यथा व्यक्त केली
गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट केले की, मी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आमच्या वीर सुरक्षा दलाच्या जवानांच्या बलिदानाला नमन करतो. देश त्यांचे शौर्य कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना. शांती आणि प्रगतीच्या या शत्रूंविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील. जखमी लवकर बरे होण्याची कामना करतो.”
22 jawans martyred in Naxal attack in Bijapur Chhattisgarh, search operation continues
महत्त्वाच्या बातम्या
- Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदांवर भरती, 75 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
- दलित लेखकाने सरस्वती सन्मान का स्वीकारावा? डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या लेखातून दिले उत्तर
- गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे निधन, 40 वर्षांपासून विविध धार्मिक पत्रिकांचे केले संपादन
- अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन होऊन घेतोय उपचार
- ‘भाईपो’च्या करामती: ममतांचा भाचा अभिषेक यांनी कोळसा माफिया, गाईंचे तस्कर यांच्याकडून लुटले ९०० कोटी! विजयवर्गीय यांचा आरोप