• Download App
    Yogi governments खाद्यपदार्थातील भेसळीवर योगी सरकारची

    Yogi governments : खाद्यपदार्थातील भेसळीवर योगी सरकारची कडक भूमिका

    Yogi governments

    आता दुकानांवर मालक-व्यवस्थापकाचे नाव लिहावे लागणार


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath )  यांनी दिल्या आहेत. देशातील विविध भागात घडणाऱ्या अशा घटनांची दखल घेत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री योगी यांनी राज्यातील सर्व हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट इत्यादी संबंधित आस्थापनांची कसून चौकशी, पडताळणी आदी सूचना दिल्या आहेत. तसेच सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.



    ते म्हणाले की, अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागात मानवी कचरा, अखाद्य आणि घाणेरड्या पदार्थांसह रस, डाळ, रोटी या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. अशा घटना भीषण असून सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. असे दुर्भावनापूर्ण प्रयत्न अजिबात मान्य करता येणार नाहीत.

    उत्तर प्रदेशात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस व्यवस्था करण्याची गरज आहे. ढाबा, रेस्टॉरंट इत्यादी खाण्याच्या आस्थापनांची तपासणी करणे आवश्यक आहे. राज्यव्यापी सघन मोहीम राबवून या आस्थापनांच्या चालकांसह तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात यावी. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई त्वरीत पूर्ण करावी.

    Yogi governments strict stance on food adulteration

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी