• Download App
    योगी आदित्यनाथ हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कबुली । Yogi Adityanath is a better CM than me; Confession of Union Defense Minister Rajnath Singh

    योगी आदित्यनाथ हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कबुली

    वृत्तसंस्था

    प्रयागराज : योगी आदित्यनाथ हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री आहेत, अशी प्रांजळ कबुली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. रविवारी प्रतापगढ जिल्ह्यातील कलहूगंज, पट्टी भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना सिंह म्हणाले, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आणि ती राखण्यासाठी सर्व प्रयत्न केले, आणि त्याच्या मॉडेलचे देशभरात कौतुक होत आहे.” Yogi Adityanath is a better CM than me; Confession of Union Defense Minister Rajnath Singh

    सिंह हे प्रतापगढ जिल्ह्यातील पट्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ ​​मोती सिंह यांच्या प्रचार सभेत बोलत होते.



    राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे आणि त्यात सुधारणा करणे गरजेचे होते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीत्याची खरोखरच गरज होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते यशस्वीरित्या साध्य केले आहे, असे ते म्हणाले.

    “आता गुंड आणि माफिया वठणीवर आले असून तुरुंगाची हवा खात आहेत. योगींचे बुलडोझर शहराची चर्चा बनले आहेत आणि मी त्यांना आणखी बुलडोझर खरेदी करण्याचा सल्लाही दिला आहे,” असे संरक्षण मंत्री म्हणाले. माफिया आणि गुंडांच्या मालमत्ता पाडल्या जात आहेत आणि योगींच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आता त्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधत आहे, असेही ते म्हणाले. जेवर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री योगी यांच्या सक्रिय भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले आणि त्यामुळे हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचे सांगितले.

    Yogi Adityanath is a better CM than me; Confession of Union Defense Minister Rajnath Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??