• Download App
    भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल । World Health Organization pays special attention to India's 100 crore vaccinations

    भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताने जिद्दीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केला. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून संघटनेचे प्रमुख महासंचालक टेडॉर्स घेब्रायासस यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. World Health Organization pays special attention to India’s 100 crore vaccinations

    गेल्या दीड वर्षांच्या काळात भारताच्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येने मोठ्या धैर्याने कोरोनासारख्या घातक लाटेला यशस्वी तोंड दिले. याच काळात भारतीय वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्राने मोठी मजल गाठत विविध लसींच्या उत्पादनापर्यंत विक्रम केले आणि आता तर त्याहीपेक्षा मोठा टप्पा गाठून देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरण पूर्ण केले आहे.



    100 कोटींचा टप्पा इतक्या अल्पावधीत गाठणे ही खूप मोठी कामगिरी मानली पाहिजे. यासाठी सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, तेथील सर्व अधिकारी कर्मचारी, डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचारी यांचे फार मोठे योगदान आहे. याविषयी टेडॉर्स घेब्रायासस यांनी विशेषत्वाने आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे.

    कोरोनाची लाट जोरात असताना त्यांच्याच विषयी जागतिक पातळीवर मोठा वाद झाला होता. टेडॉर्स घेब्रायासस हे चीनचे पक्षपाती आहेत, असा आरोप अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यांच्या नि:पक्षपातीपणा विषयी जागतिक पातळीवर मोठी शंका उत्पन्न झाली होती. परंतु सध्या ते जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत. त्यामुळे त्यांनी भारताचे विशेष अभिनंदन करणे याला महत्त्व आहे.

    World Health Organization pays special attention to India’s 100 crore vaccinations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न