भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने श्रीमंतांकडून परदेशात जाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यातच संयुक्त अरब आमिरातीची (यूएई) भारतासोबतची विमानसेवा रविवारपासून १० दिवसांसाठी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर हवाई प्रवास भाड्यात मोठी वाढ झाली, तसेच खासगी जेट विमानांची मागणीही वाढली आहे.With the increase in air fares, the demand for private jets also increased
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने श्रीमंतांकडून परदेशात जाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यातच संयुक्त अरब आमिरातीची (यूएई) भारतासोबतची विमानसेवा रविवारपासून १० दिवसांसाठी बंद राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर हवाई प्रवास भाड्यात मोठी वाढ झाली, तसेच खासगी जेट विमानांची मागणीही वाढली आहे.यूएईची विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर शुक्रवारपासून श्रीमंत भारतीयांनी देशाबाहेर जाण्याची घाई सुरू केली.
मुंबई ते दुबई अशा एकमार्गी व्यावसायिक विमानांचे शुक्रवार आणि शनिवारी या दोन दिवसांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले. त्यामुळे प्रवास भाडे सामान्य काळातील भाड्याच्या तुलनेत १० पट वाढून ८० हजार रुपये (१ हजार डॉलर) झाले. याशिवाय नवी दिल्ली ते दुबई या मार्गावरील तिकिटाचे दर ५ पट वाढून ५० हजार रुपये झाले.
एअर चार्टर सर्व्हिस इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवार-शनिवार या दोन दिवसांसाठी खासगी जेट विमानांची मागणी प्रचंड वाढली. शनिवारी आमची १२ विमाने दुबईला गेली. ही सर्व विमाने पूर्ण क्षमतेने भरलेली होती.
आज एकाच दिवसात विमानांची चौकशी करणारे ८० कॉल मी नोंदवले. मुंबई ते दुबई या मार्गावरील १३ आसनी विमानाचे भाडे ३८ हजार डॉलर; तर सहा आसनी विमानाचे भाडे ३१ हजार डॉलर आहे. विमानात जागा मिळावी,
यासाठी लोक समूह करून आमची जेट विमाने बुक करीत आहेत. आम्हाला थायलंडसाठीही काही विचारणा झाल्या; पण बहुतांश मागणी दुबईसाठीच होती. यूएई आणि भारत यांच्यात दर आठवड्याला ३०० व्यावसायिक विमान उड्डाणे होतात. यूएईमध्ये ३.३ दशलक्ष भारतीय राहतात. यातील बहुतांश लोक दुबईत राहतात
With the increase in air fares, the demand for private jets also increased
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! दारूची तल्लफ जिवावर उठली, सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये 7 मजुरांचा मृत्यू
- जबरदस्त : कोव्हॅक्सिन खऱ्या अर्थाने बनले स्वदेशी, कच्च्या मालासाठी अमेरिकीची गरज नाही, उत्पादनही वार्षिक 70 कोटी डोस जगात सर्वाधिक
- 22 मंत्र्यांनी तक्रार करूनही दखल नाहीच, डॉ. व्यास यांना कुणाचे अभय?, आरोग्यमंत्री टोपेंनीही टेकले हात, खात्याचा सचिवही बदलता येईना
- लसीच्या दरांबद्दलच्या सर्व शंका केंद्र सरकारने केल्या दूर, 150 रुपयांत लस घेऊन राज्यांना पुढेही मोफतच देणार
- Delhi Oxygen Crisis : ऑक्सिजनअभावी दिल्लीत 20 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा जास्त रुग्णाचा जीव टांगणीला