• Download App
    रोमा - रोमांत राम, आज पूर्ण देश राममय आहे, गुलामी संपून देशाचा सुवर्ण त्रेतायुगात प्रवेश; योगी आदित्यनाथांचे उद्गार With the end of slavery, the country entered the Golden Treta Yuga

    रोमा – रोमांत राम, आज पूर्ण देश राममय आहे, गुलामी संपून देशाचा सुवर्ण त्रेतायुगात प्रवेश; योगी आदित्यनाथांचे उद्गार

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी संपन्न झाला आहे. श्रीराम प्रथमच दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प केला. त्यानंतर पूजा सुरू केली. पंतप्रधानांनीच रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी काढून हातात कमळ देऊन त्यांची पूजा केली. रामलल्ला पितांबराने शोभून आहेत. त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. With the end of slavery, the country entered the Golden Treta Yuga

    यानिमित्त देश-विदेशातील अनेक पाहुणे आले आहेत. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुकेश-नीता अंबानी, गौतम अदानी, अमिताभ बच्चन, रजनीकांत यांचा समावेश आहे.

    योगी म्हणाले की, रामलल्ला सिंहासनावर विराजमान आहेत. भारत या दिवसाची वाट पाहत होता. रामलल्लाची प्रतिमा तुलसीदासांनी सांगितल्याप्रमाणेच आहे. भाग्यवान आहे आजची पिढी जी या क्षणाची साक्षीदार आहे. आज संपूर्ण जग अयोध्येच्या वैभवाचे कौतुक करत आहे. अयोध्या शहर जगाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रस्थापित होत आहे.

    जिथे आम्ही संकल्प केला होता, तिथेच मंदिर बांधले आहे.

    पीएम मोदींनी प्राणप्रतिष्ठेनंतर उपवास सोडला, स्वामी गोविंददेव गिरींच्या हातून जल प्राशन, 11 दिवसांपासून सुरू होता उपवास.

    सीएम योगी आदित्यनाथ यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार केला.

    मुकुटाचे वजन तब्बल 5 किलो

    रामलल्लाला सोन्याचे कवच कुंडल, करधन माला घालण्यात आली. मुकुटाचे वजन सुमारे 5 किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. देवाच्या हातात सोन्याचे धनुष्य आहे.

    प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित असलेले अभिनेते अनुपम खेर म्हणाले- हे ऐतिहासिक, अद्भुत आहे. असे वातावरण हिंदू धर्मात दिसले नाही. हे दिवाळीपेक्षा मोठे आहे. हीच खरी दिवाळी आहे.

    अमिताभ बच्चनदेखील अभिषेक सोहळ्यात सहभागी झाले आहेत. अभिषेकही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

    अयोध्येचे ‘राजा’ आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा म्हणाले की, त्यांच्या हयातीत राम मंदिर बांधले जाईल आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केले जाईल, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. राम वनात गेल्यावर अयोध्येत कोणालाच आनंद झाला नाही. त्यानंतर रावणाने सीताजींना नेले. त्यामुळे अयोध्या दुःखी झाली. राम, सीता आणि लक्ष्मण परत आल्यावर अयोध्येतील लोकांचा आनंद परतला. आज राम मंदिराच्या उभारणीने रामनगरीला पुन्हा जुने वैभव प्राप्त झाले आहे. बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांना लोक पप्पू भैया किंवा पप्पू राजा असेही म्हणतात. राज्य सरकार अयोध्येसाठी हेलिकॉप्टर सेवाही सुरू करणार आहे, यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल, असेही मिश्रा म्हणाले.

    With the end of slavery, the country entered the Golden Treta Yuga

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट