• Download App
    ममतांचे कौतुक कशाला? एन. टी. रामाराव, देवीलाल यांनीही केला मिळविला होता विजय, पण प्रादेशिक नेत्यांना देशाने स्वीकारले नाही|Why appreciate Mamata? N. T. Rama Rao and Devi Lal had also won, but the country did not accept the regional leaders

    ममतांचे कौतुक कशाला? एन. टी. रामाराव, देवीलाल यांनीही केला मिळविला होता विजय, पण प्रादेशिक नेत्यांना देशाने स्वीकारले नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यावर ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत. मात्र, प्रादेशिक नेत्यांना देश स्वीकारत नाही. आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव आणि हरियाणात देवीलाल यांनीही मोठा विजय मिळविला होता.Why appreciate Mamata? N. T. Rama Rao and Devi Lal had also won, but the country did not accept the regional leaders

    मात्र, त्यांना राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले गेले नाही, असा दावा जनता दलाचे (संयुक्त) नेते के. सी. त्यागी यांनी केला आहे.दीर्घकाळपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आणि दिल्लीमध्ये असलेले त्यागी म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या विजयामुळे अनेक जण हुरळून गेले आहेत.



     

    मात्र, प्रादेशिक पातळीवर मोठा विजय मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत. एन. टी. रामाराव, देविलाल आणि शरद पवार यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांकडून राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याचा प्रयत्न केला गेला होता.

    मात्र, देशातील जनता त्यांना स्वीकारत नाही हे आत्तापर्यंत सिध्द झाले आहे. त्यामुळे ममतांची गतही तशीच होणार आहे. कारण प्रादेशिक पक्षांची ताकद तेवढी नसते. त्यामुळे ममतांसाठी दिल्ली दूरच असणार आहे.

    कॉँग्रेस आणि डावे पक्ष ममतांच्या विजयाने आनंदी झाल्यासारखे वाटत आहे. पण त्यांनी लक्षात घ्यावे की ममता त्यांना हरवून नव्हे तर नेस्तनाबूत करून पश्चिम बंगालमध्ये विजयी झाल्या आहेत, असा टोलाही त्यागी यांनी लगावला.

    Why appreciate Mamata? N. T. Rama Rao and Devi Lal had also won, but the country did not accept the regional leaders

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य