विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदू धर्मीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची कॉँग्रेस नेत्यांनी मालिकाच सुरू केली आहे. सलाम खुर्शीद यांनी हिंदूत्वाची तुलना आयसीस आणि बोकोहरम या दहशतवादी संघटनांशी केल्यानंतर आता राशीद अल्वी म्हणाले आहेत की जय श्रीरामाची घोषणा देणारे सगळेच मुनी नाहीत तर राक्षस आहेत.What happened to the Congress leaders? Now Rashid Alvi said that not everyone who announces Jai Shri Rama is a sage but a demon
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदुत्वाचं विश्लेषण वादात सापडले असताना आता राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. जय श्री रामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपाकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या विधानांमुळे काँग्रेस पक्षावरही टीकेची झोड उठली आहे.
भाजपा नेते अमित मालवीय यांनी राशीद अल्वी यांच्या या विधानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राशीद अल्वी जय श्री रामची घोषणा करणाऱ्यांविषयी मत मांडताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, जे जय श्रीरामची घोषणा देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.
राशिद अल्वी यांचा व्हिडीओ पोस्ट करताना अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशिद अल्वी जय श्रीराम म्हणणाºयांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. राम भक्तांच्या बद्दल काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळले आह.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा याबाबत म्हणाले, रामावरून राजकारण केलं जाऊ नये. रामाच्या अनुयायांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. लोक याचे सडेतोड उत्तर देतील. रामभक्तांविषयी केलेली अशी विधानं चुकीची आहेत.
What happened to the Congress leaders? Now Rashid Alvi said that not everyone who announces Jai Shri Rama is a sage but a demon
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!