Governor Jagdeep Dhankhar : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. याच भागाचा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज दौरा केला. आसामच्या अगोमणी भागात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यादरम्यान एका वृद्ध व्यक्तीने राज्यपालांना बिलगून अश्रू ढाळत आपल्या वेदना व्यक्त केल्या. वृत्तसंस्था एएनआयने राज्यपालांच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात एक वृद्ध राज्यपालांना बिलगून रडताना दिसत आहे. West Bengal Governor Jagdeep Dhankhar Meets Post Poll Violence-Hit People At Ranpagli Camp In Assam
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. याच भागाचा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज दौरा केला. आसामच्या अगोमणी भागात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यादरम्यान एका वृद्ध व्यक्तीने राज्यपालांना बिलगून अश्रू ढाळत आपल्या वेदना व्यक्त केल्या. वृत्तसंस्था एएनआयने राज्यपालांच्या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात एक वृद्ध राज्यपालांना बिलगून रडताना दिसत आहे. राज्यपालांना त्यांनी हिंसाचाराची कहाणी सांगत सांगितली. यावर राज्यपालांनी वृद्ध आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून त्यांनी बंगालमध्ये आपली घरे सोडल्याचा दावा छावणीत राहणाऱ्या पीडितांनी केला आहे. ‘तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी’ त्यांच्या घरांची तोडफोड केली, असा आरोपही त्यांनी केला. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी कूचबिहार ते रणपागळीच्या शिबिरापर्यंत रस्त्याने प्रवास केला आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली.
बंगालसमोर दुहेरी आव्हान
विशेष म्हणजे गुरुवारी राज्यपाल जगदीप धनखड हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी कूचबिहार येथे पोहोचले, सीतलकुची येथे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि गो बॅकचे घोषणा देण्यात आल्या. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे बाधित झालेल्या जिल्ह्याचा दौरा करणारे राज्यपाल धनखड म्हणाले, “एकीकडे कोरोनाच्या आव्हानाला देश सामोरा जात आहे. पश्चिम बंगालसमोर दुहेरी आव्हान आहे. ते म्हणाले की, ही हिंसा केवळ याच आधारावर घडत आहे, कारण काही लोकांनी मर्जीने मतदानाचा निर्णय घेतला.
राज्यपालांच्या दौर्यावरून राजकारण
राज्यपालांच्या दौऱ्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी त्यांना एक पत्र लिहून म्हटले की, निवडणूकनंतर झालेल्या हिंसाचाराने प्रभावित झालेल्या कूचबिहार जिल्ह्यातील त्यांचा दौरा नियमांचे उल्लंघन आहे, तर धनखड यांनी घटनेनुसार आपली कर्तव्ये बजावत असल्याचे सांगून त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
West Bengal Governor Jagdeep Dhankhar Meets Post Poll Violence-Hit People At Ranpagli Camp In Assam
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी, खा. संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- लॅन्सेटचा भारतविरोधी अहवाल म्हणजे बड्या औषधी कंपन्यांचा डाव, परदेशी माध्यमांकडूनच लॅन्सेटच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
- हवामान विभागाचा राज्यात 16-17 मे रोजी ऑरेंज अलर्ट, वाचा.. अलर्टचे प्रकार, कोणत्या अलर्टमध्ये काय काळजी घ्यावी?
- PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान मोदींनी जारी केला 8वा हप्ता, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी जमा
- Eid Mubarak : पीएम मोदी, राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा, उत्सवी वातावरणात अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचा विसर