या दाव्याने शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांची झोप उडाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Baloch Army बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या कलाट विभागात स्थित सुरब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.Baloch Army
द बलुचिस्तान पोस्टच्या बातमीनुसार, बलुच आर्मीच्या सदस्यांनी सुरब शहरातील बँक, पोलिस स्टेशन आणि इतर सरकारी प्रतिष्ठानांवर ताबा मिळवला आहे. बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलएने असेही म्हटले आहे की या संदर्भात लवकरच मीडियाला सविस्तर माहिती दिली जाईल.
बलुचिस्तान बऱ्याच काळापासून स्वातंत्र्याची मागणी करत आहे. बलुच अमेरिकन काँग्रेसचे सरचिटणीस रज्जाक बलुच यांनीही भारत आणि अमेरिकेला बलुच स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. आता बलुच आर्मीच्या या दाव्याने शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांची झोप उडवली आहे. बलुचिस्तान पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की शेकडो सशस्त्र बीएलए सैनिकांनी सुरब शहरावर हल्ला केला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना शरण येण्यास भाग पाडले. यादरम्यान अनेक सरकारी वाहनांना आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
We have captured Pakistan’s Surab city Baloch Armys big claim
महत्वाच्या बातम्या
- NASA : NASAने अवकाशात बटाटे का पाठवले? कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
- मोदी विरुद्ध ममतांच्या संघर्षात कम्युनिस्टांना कंठ फुटला; 14 वर्षांच्या झोपेनंतर विळा हातोडा बाहेर काढला!!
- Jyotiraditya Scindia : जागतिक रिअल टाइम पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४७ टक्के – ज्योतिरादित्य सिंधिया
- Jagadguru Rambhadracharya : ‘पाकिस्तानातही राम मंदिर बांधले जाईल, तिथेही रामकथा होईल’,