• Download App
    विश्व संवाद केंद्राचे "हमारा व्हिक्टरी पंच" गाणे भारतीय ऑलिम्पिक वीरांसाठी समर्पित Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players

    विश्व संवाद केंद्राचे “हमारा व्हिक्टरी पंच” गाणे भारतीय ऑलिम्पिक वीरांसाठी समर्पित

    प्रतिनिधी

    मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी  विश्व संवाद केंद्र, मुंबई च्या वतीने ‘हमारा व्हिक्टरी पंच’ हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. हे गीत प्रसिद्ध गीतकार रश्मी-विराग मिश्रा यांनी  लिहिले आहे.  Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players

    ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये  सहभागी होऊन भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरणाऱ्या सर्व खेळाडूंना  तसेच आजपासून सुरु झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.  केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतवासीयांना व्हिडिओ तयार करण्याचे आवाहन केले होते.



    टोकियो ऑलिम्पिक  स्पर्धांना २३  जुलैपासून जपानमध्ये सुरुवात झाली आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धांसाठी भारतातील प्रस्थापित तसेच नवोदित असे १२६  खेळाडू टोक्योमध्ये रवाना झाले आहेत.

    Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही

    CBSE Class : CBSEच्या 12वीच्या पेपरवर गाण्याचा क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर यू-ट्यूब लिंक उघडत आहे, CBSE ने म्हटले- चूक झाली, पण पेपर सुरक्षित

    Chandigarh Firm : अण्वस्त्र आणीबाणीच्या तयारीत खाडीतील देश; चंदीगडमधील औषध कंपनीकडे अणुआपत्तीत उपयुक्त ठरणाऱ्या 1 कोटी कॅप्सूलबाबत विचारणा