• Download App
    Vishwa Hindu Parishad movement मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन; 5 जानेवारीला आंध्र प्रदेशातून प्रारंभ!!

    मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन; 5 जानेवारीला आंध्र प्रदेशातून प्रारंभ!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने देशातली मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्त करायचे आंदोलन सुरू केले असून 5 जानेवारीला आंध्र प्रदेशातून या आंदोलनाचा प्रारंभ होणार आहे 5 जानेवारी 2025 रोजी विजयवाड्यामध्ये मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्ती संदर्भातल्या जनजागृती मोहिमेची पहिली सभा होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर अशा सहभाग घेत मोठी जनजागृती करण्यात येणार आहे. Vishwa Hindu Parishad movement

    देशभरातल्या मंदिरांवरचे सरकारी नियंत्रण उठवावे. मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत. मंदिरांच्या व्यवस्थापनात अनुसूचित जाती जमाती यांच्यासह जास्तीत जास्त हिंदू समाज घटकांचा समावेश करावा. हिंदू नसलेल्या घटकांना मंदिरांच्या जमिनी अथवा मालमत्ता व्यवस्थापनात स्थान असू नये. त्याचबरोबर त्यांना त्याचे वाटपही करू नये. मंदिरांचा निधी हा हिंदू समाज घटकांसाठी विविध सेवा कार्यांसाठी खर्च व्हावा. तो अहिंदू समाजासाठी त्यांच्या कुठल्या कार्यासाठी परस्पर सरकारने खर्च करू नये अशा विविध मागण्या विश्व हिंदू परिषदेने केल्या आहेत.


    सुप्रिया सुळेंनी सांगून देखील युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतलाच नाही??


    या सर्व संदर्भांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देशभर मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आले आहे. देशातल्या विविध राज्य सरकारांना मंदिरे कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने काही प्रारूप दिले असून त्या विषयाची चर्चा देखील जनजागृती दरम्यान होणाऱ्या सभांमधून करण्यात येणार आहे.

    तिरुपती सारख्या मोठ्या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये ख्रिश्चन समुदायातल्या नेत्यांना स्थान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेची मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्ती मोहीम आता वेग घेणार आहे.

    Vishwa Hindu Parishad movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार