वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्यानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला येथे पाचारण करण्यात आले आहे. मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात 3 मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर 4 मे रोजी येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने हल्लेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. यासोबतच सुरक्षेसाठी लष्करही तैनात करण्यात आले होते.Violence again in Manipur’s Imphal, Army called in; Curfew imposed, 71 killed in May 3rd riots
आज पुन्हा हिंसाचार झाल्यानंतर लष्कर आणि निमलष्करी दल मणिपूरमध्ये पाठवण्यात आले. राज्याची राजधानी इंफाळमधील न्यू चेकॉन भागातील स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये भांडण झाले. परिसरातून जाळपोळ झाल्याचे वृत्त आल्यानंतर कर्फ्यू जाहीर करण्यात आला. यापूर्वी दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.
नेमके काय घडले मणिपूरमध्ये?
3 मे रोजी सुरू झालेल्या कुकी-नागा आणि मेतेई समुदायांमधील हिंसाचारात एकूण 71 लोकांचा मृत्यू झाला. 230 हून अधिक लोक जखमी झाले असून 1700 घरे जळाली आहेत. हिंसाचारानंतर येथे इंटरनेट बंद आहे. कर्फ्यू वेळोवेळी शिथिल करण्यात येत आहे.
उग्रवाद्यांच्या सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक कमांडो ठार
गेल्या आठवड्यात येथे मणिपूर कमांडो आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये 6 कमांडो जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. याशिवाय चुराचंदपूर येथे तीन पीडब्ल्यूडी मजुरांचे मृतदेह एका वाहनात सापडले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 300 मीटर खोल खंदकातून मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचा अपघाती मृत्यू झाला की कोणी खून केला याचा तपास सुरू आहे.
जळालेल्या घरांमधून सामान गोळा करणारे लोक बेपत्ता झाले
सुमारे 10 दिवसांपूर्वी बिष्णुपूर आणि चुराचांदपूरच्या सीमेवरील तोरबांग गावात 11 जण त्यांच्या जळालेल्या घरांतील वस्तू घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्याच्यावर उग्रवाद्यांनी हल्ला केला. आठ जण पळून गेले आणि बीएसएफ कॅम्पमध्ये पोहोचले, तर तिघे अद्याप सापडलेले नाहीत.
आसाम रायफल्स, बीएसएफ आणि सीआरपीएफने त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली, परंतु अद्याप त्यांना शोधण्यात यश आलेले नाही.
Violence again in Manipur’s Imphal, Army called in; Curfew imposed, 71 killed in May 3rd riots
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!