नाशिक : नारीशक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्ती मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन होत असताना काँग्रेस सह सर्व विरोधकांनी संबंधित विधेयकाला विरोधाचे भूमिका घेतली पण महिला आरक्षण 2029 मध्येच लागू करण्यासाठी विरोधकांनी आग्रह धरल्याचा ट्विस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिला.
नारीशक्ती वंदन अधिनियम घटनादुरुस्तीसाठी 16 एप्रिल ते 18 एप्रिल अशा तीन दिवसांमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन होत असतात यांनी मोदी सरकार आणि बाकीचे विरोधक यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकमेकांना पत्रे लिहिली. नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या नावाखाली मोदी सरकार लोकसभेची फेररचना करून मतदारसंघ वाढवायचा प्रयत्न करतंय, ते घटनाबाह्य असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. त्यांना काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या खासदारांची साथ मिळाली.
नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या नावाखाली मोदी सरकारला लोकसभेचे मतदार संघ वाढवायचे आहेत. त्यात तर भारतातले 200 तर दक्षिण भारतात फक्त 60 मतदारसंघ वाढवायचेत. असा आरोप काँग्रेसचे खासदार मणिक्कम टागोर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्या पाठोपाठ आज राष्ट्रीय महिला आयोगाने राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या नारीशक्ती वंदन मेळाव्यात मोदींनी विरोधकांची सौम्य भाषेत कानउघडणी केली. संसदेने 2023 मध्ये इतिहास रचला. सर्व पक्षांनी मिळून नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयक मंजूर केले. त्याचवेळी सर्व विरोधकांनी संबंधित कायदा 2029 मध्ये लागू करण्याचा आग्रह धरला होता. विरोधकांचा हा आग्रह सरकारने गांभीर्याने घेतला त्या दृष्टीने घटना बदल करण्यासाठी 16 एप्रिल ते 18 एप्रिल अशा तीन दिवसांमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन कार्यक्रमात दिली.
– विरोधकांच्या विसंगत भूमिकेवर बोट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या एकाच वक्तव्यामुळे विरोधकांच्या आधीच्या आणि नंतरच्या भूमिकेची पोलखोल झाली. 2023 मध्ये विरोधकांनीच आग्रह धरला होता की महिला आरक्षण 2019 मध्येच प्रत्यक्षात यावे पण ज्यावेळी मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलाविले त्यावेळी मात्र काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी सरकारच्या प्रस्तावाला विरोध केलाय. यातल्या विसंगतीवरच आज मोदींनी विज्ञान भवनातल्या कार्यक्रमातून बोट ठेवले.
Vijaya Rahatkar says, “Atal Bihari Vajpayeeji had said, “Women hold up half the sky, so shouldn’t they hold at least one third of the political ground?”
महत्वाच्या बातम्या
- SSC : SSC चुकीच्या प्रश्नावर पूर्ण गुण देणार; ऑब्जेक्शन मॅनेजमेंट सिस्टम 2026 सुरू
- चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज; आशाताईंच्या स्वरांची सोबत कायम राहील!!
- “आशाताई” – दि लास्ट एम्परर; राज ठाकरेंची भावपूर्ण श्रद्धांजली
- PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- बंगाल बदलासाठी तयार; TMCच्या भयाच्या राजवटीला हटवणार