• Download App
    VIDEO : विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूमध्ये मोदी, शहा गेले आणि बघा पुढे काय घडलं.... VIDEO Modi Shah go to Indian teams dressing room after World Cup defeat and see what happened next

    VIDEO : विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूमध्ये मोदी, शहा गेले आणि बघा पुढे काय घडलं….

    मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, बघा नेमकं काय घडलं

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर अवघा देश दु:खात होता. कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाच्या खेळाडूंना तर अश्रू अनावर झाले होते. अशावेळी अंतिम सामना पाहण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भारतीय खेळाडूंच्या ड्रेसिंगरुमध्ये गेले आणि त्यांनी खेळांडूचे सांत्वन करून धीर दिला. VIDEO Modi Shah go to Indian teams dressing room after World Cup defeat and see what happened next

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. मोहम्मद शमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारून सांत्वन केले. जडेजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून पंतप्रधानांच्या भेटीचा अनुभवही शेअर केला. त्याच वेळी, आता ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये पंतप्रधान सर्व खेळाडूंशी बोलत आहेत.

    पंतप्रधान कोहली आणि रोहितला म्हणाले, ‘तुम्ही सगळे 10-10 सामने जिंकून परत आलात, हे होतच राहते, हसा भाऊ, देश तुम्हाला पाहत आहे. असे घडत असतं.” यानंतर, पंतप्रधानांनी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही संवाद साधला, “तुम्ही खूप मेहनत केली पण हे होतच असतं.” असं म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी जडेजा यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले. पंतप्रधानांनी बुमराशी गुजरातीमध्ये संवाद साधला.

    VIDEO Modi Shah go to Indian teams dressing room after World Cup defeat and see what happened next

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!