• Download App
    बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड संतापजनक, शांतीसेना पाठविण्याची विहिंपची मागणी|VHP says send shantisena in Bangaladesh

    बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड संतापजनक, शांतीसेना पाठविण्याची विहिंपची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – बांगलादेशात सुरू असलेले हिंदूंचे हत्याकांड संतापजनक असून संयुक्त राष्ट्राने त्या देशात शांतीसेना पाठवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. मुस्लिम मतांसाठी बांगलादेशातील नरसंहारावर कॉंग्रेस व विरोधी पक्ष देशाबरोबर गद्दारी करत आहेत असाही आरोप त्यांनी केला.VHP says send shantisena in Bangaladesh

    बांगलादेशातील परिस्थिती गंभीर आहे. तेथे हिंदू नागरिकांवर वाढते हल्ले होत आहेत. त्यामुले संयुक्त राष्ट्रांनी त्या देशाबाबत कठोर निर्णय घेऊन तातडीने कारवाई करावी व तेथे शांतीसेना पाठवावी, अशीही मागणी जैन यांनी केली.



    काश्मीरमधील हत्याकांडाचा प्रेरक पाकिस्तान असून त्या देशाचे कंबरडे मोडले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. जगात केवळ भारतातील मुस्लिम समाज शांततेने राहतो आहे, असे सांगून जैन म्हणाले, की त्या त्या देशातील गैर मुस्लिमांना जिवंत ठेवणार नाही हा बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तानातील एकमेव अजेंडा आहे. काश्मीहरमध्ये त्याचेच पडसाद उमटत आहेत.

    देशातील सरकार काश्मीरबाबत कधी नव्हे एवढी कठोर पावले उचलत आहे. काश्मिरात ३७० वे कलम रद्द केल्यावर सामान्य काश्मिरी मुस्लिम नागरिकाला विकास हवा आहे. मात्र दहशतवाद्यांची हिंमत पाकिस्तानमुळे वाढली आहे हे स्पष्ट असल्याने केंद्राने तशी पावले उचलावीत अशी मागणी विहिंप करत आहे.

    VHP says send shantisena in Bangaladesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल