वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संपूर्ण पाकिस्तान देश राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि नैसर्गिक समस्यांच्या गर्तेत रुतला असताना अमेरिकेने पाकिस्तानला f16 विमानांच्या मेंटेनन्स साठी नुकताच कोट्यावधी डॉलरचा निधी रिलीज केला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी अमेरिका – पाकिस्तान संबंधांवर परखड भाष्य केले आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध खूप जुने असले तरी ते दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हितासाठी फुलद्रूप ठरले नाहीत किंबहुना नाकामच ठरले आहेत, असे मत जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. US-Pakistan relations have failed for both countries
अमेरिका – पाकिस्तान संबंधांची चिकित्सा करताना जयशंकर म्हणाले, की f16 ची क्षमता सगळ्यांना माहिती आहे ती विमाने कुठे तैनात केली आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही हे सगळे दहशतवाद विरोधात कार्यवाही करण्यासाठी करतो आहोत असे सांगून अमेरिका आणि पाकिस्तान हे दोन देश इतरांना किती दिवस मूर्ख बनवू शकणार आहेत?? अमेरिकेने पाकिस्तानसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली, त्याचे फळ अमेरिकेला काय मिळाले?? किंवा पाकिस्तानला देखील राष्ट्रीय हितासाठी त्याचा कितपत लाभ झाला??, याचा वास्तववादी विचार केला तर हे संबंध फलद्रूप झाले नसल्याचेच दिसून येईल.
मी कधीतरी अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना हे विचारीन की, भारताचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवा पण अमेरिकेने जेवढी म्हणून गुंतवणूक पाकिस्तानात केली याचा खुद्द अमेरिकन राष्ट्रीय हितासाठी किंवा पाकिस्तानी राष्ट्रीय हितासाठी देखील याचा लाभ किती झाला?, दोन्ही देशांच्या हाती नेमके काय लागले?? याची गुणवत्तेच्या आधारावर पडताळणी कधी करणार आहात की नाही?? तशी पडताळणी केली तर अमेरिकेने जेवढी किंमत मोजली आहे त्या पटीत त्यांना खरंच लाभ झाला नाही आणि दोन्ही देशांचे संबंध फलदरूप झाले नाहीत हाच निष्कर्ष काढावा लागेल.
अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने ज्यावेळी पाकिस्तानला एफ f16 विमानांच्या मेंटेनन्स साठी काही लाख डॉलर्सचा निधी दिला आहे, त्यावेळी दोन्ही देशांच्या संबंधांवर जयशंकर यांनी परखड मत व्यक्त करणे याला विशिष्ट महत्त्व आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली आहे.
US-Pakistan relations have failed for both countries
महत्वाच्या बातम्या
- राजस्थान काँग्रेस मधील पेचप्रसंगात गहलोत गट – काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या परस्पर विसंगत वक्तव्यांनी भर
- अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वत:हून पाडा; सुप्रीम कोर्टाचे नारायण राणेंना आदेश
- नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात महिला आरोग्य विशेष अभियान; ग्रामीण भागात विशेष भर
- राजस्थानात काँग्रेस नेतृत्वाची लढाई रस्त्यावर; रस्त्यावरच्या पोस्टर्सवर