• Download App
    हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर – योगी आदित्यनाथ|UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation

    हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर – योगी आदित्यनाथ

    विशेष प्रतिनिधी

    गाझीपूर – हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर आला आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.त्यानी गाझीपूरच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation

    आशिया खंडातील सर्वात मोठे खेडे गहमर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त १८२ कुटुंबीयांना मदत साहित्य दिले. दरम्यान, यमुना आणि बेतवा नदीला आलेल्या पुरामुळे शंभर गावे पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. पूरग्रस्त भागात पोलिस अधीक्षकांनी नौकेतून पाहणी केली आणि खाद्यसामग्री पोचवली.



    यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, की २४ तहसीलतंर्गत ६२० गावांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून पीडितांना मदत पोचवली जात आहे. आमदारांनी लोकांशी भेटून त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे आवाहन केले. पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे आदित्यनाथ म्हणाले.

    UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट