• Download App
    संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा, सावध झाला नाहीत तर भयंकर जलसंकटाशी होईल भारताचा सामना UN's dire warning, India will face dire water crisis if not careful

    संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा, सावध झाला नाहीत तर भयंकर जलसंकटाशी होईल भारताचा सामना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालानुसार, 2050 मध्ये जगातील 1.7 ते 2.40 अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो, ज्याचा सर्वाधिक परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 2016 मध्ये 93.3 कोटी शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागला होता. UN’s dire warning, India will face dire water crisis if not careful

    युनायटेड नेशन्स वॉटर कॉन्फरन्स-2023 च्या अगोदर मंगळवारी (21 मार्च 2023) प्रसिद्ध झालेल्या ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023: पार्टनरशिप अँड कोऑपरेशन फॉर वॉटर’ या शीर्षकाच्या अहवालात म्हटले आहे की, आशियातील सुमारे 80 टक्के लोकसंख्या या समस्येचा सामना करत आहे. विशेषत: ईशान्य चीन, भारत आणि पाकिस्तानमध्ये जलसंकट गंभीर होईल.

    “जल संकटाचा सामना करत असलेली जागतिक शहरी लोकसंख्या 2016 मधील 93.3 कोटींवरून वाढून 2050 मध्ये 1.7 ते 2.4 अब्ज होण्याची अपेक्षा आहे, भारत हा सर्वात जास्त प्रभावित देश असेल,” असे अहवालात आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे.


    ‘दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर राजकारण करू नका’, संयुक्त राष्ट्रात भारताने दहशतवाद्यांवर ठणकावले


    युनेस्कोचे महासंचालक आंद्रे अझौले म्हणाले, “जागतिक संकट नियंत्रणाबाहेर जाण्याआधी एक मजबूत आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणण्याची तातडीची गरज आहे.” अहवालानुसार, जागतिक स्तरावर दोन अब्ज लोकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही आणि 3.6 अब्ज लोकांना सुरक्षित स्वच्छता उपलब्ध नाही.

    अहवालाचे मुख्य संपादक रिचर्ड कॉनर यांनी पत्रकारांना सांगितले की, अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत आहे. “जर तुम्ही तोडगा काढला नाही तर नक्कीच जागतिक संकट येईल.”

    संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी अहवालात म्हटले आहे की, पाणी हे मानवतेसाठी रक्तासारखे आहे. हे लोक आणि पृथ्वीच्या जीवनासाठी आणि आरोग्यासाठी, विकासासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक आहे.” गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली की मानवता एका धोकादायक मार्गावर चालत आहे, ज्यामध्ये अतिवापर आणि अतिविकास, पाण्याचा अनियंत्रित वापर, प्रदूषण आणि अनियंत्रित ग्लोबल वॉर्मिंग या राक्षसी प्रवृत्ती मानवतेच्या रक्ताचा थेंब न थेंब वाहून नेत आहेत.

    UN’s dire warning, India will face dire water crisis if not careful

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!