• Download App
    मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव, भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने ५० हजार पाणीपुरी वाटून दिला समाजाला संदेश|Unique celebration of daughter's birth, Panipuri seller in Bhopal distributed 50,000 Panipuri message to the community

    मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव, भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने ५० हजार पाणीपुरी वाटून दिला समाजाला संदेश

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ: भोपाळ येथील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव साजरा करून समाजाला संदेश् दिला आहे. मुलीचा जन्म झाल्यावर त्याने चक्क ५० हजार पाणीपुरी वाटल्या.भोपाळमधील पाणीपुरी विक्रेते अंचल गुप्ता यांचे कोलार परिसरातील रस्त्यावर त्यांचे पाणीपुरीचे छोटे दुकान आहे. त्यांनी रविवारी लोकांना मोफत झणझणीत पाणीपुरी वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत केले.Unique celebration of daughter’s birth, Panipuri seller in Bhopal distributed 50,000 Panipuri message to the community

    मुलीच्या जन्माने माझे स्वप्न साकार झाले. लग्न झाल्यापासून मुलगी जन्माला यावी, अशी माझी इच्छा होती. परंतु, दोन वर्षांपूर्वी पहिला मुलगा झाला. यावर्षी १७ ऑगस्ट रोजी मुलीच्या जन्माने देवाने इच्छा पूर्ण केली.



    मुलाचा दुसरा वाढदिवस होता. त्यामुळे मी भोपाळच्या लोकांना मोफत पाणीपुरी वाटूनमुलगी आहे, तर भविष्य आहे, असा संदेश देऊन मुलीचा जन्म साजरा करण्याचे ठरविले. गुप्तांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे. पाणीपुरी विक्रेता अंचल गुप्ताने रविवारी ३५ ते ४० हजार रुपयांची पाणीपुरी लोकांना मोफत वाटली.

    खर्चापेक्षा मला मुलगी असल्याचा मोठा आनंद आहे, असे त्याने म्हटले.रविवारी दुपारपासून ते सायंकाळपर्यंत गुप्ता यांच्या पाणीपुरीच्या दुकानांवर लोकांची गर्दी उलटली होती. पाणीपुरीचा आस्वाद घेत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

    Unique celebration of daughter’s birth, Panipuri seller in Bhopal distributed 50,000 Panipuri message to the community

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे