वृत्तसंस्था
लखनऊ : बसपा प्रमुख मायावती यांना आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. ते म्हणाले, “मायावती आरपीआयमध्ये आल्या तर आम्ही त्यांना पक्षाध्यक्ष बनवू. जेणेकरून आम्हाला बाबासाहेबांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे आरपीआय आणि बसपा यांनी एकत्र राहणे अत्यंत गरजेचे आहे.”Union Minister Ramdas Athawale’s offer to Mayawati, makes you party president in RPI!
त्याच वेळी नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल ते म्हणाले – त्यांना येण्याची आणि जाण्याची सवय आहे. आठवले एकदिवसीय दौऱ्यावर लखनऊला पोहोचले आहेत. सोमवारी त्यांनी व्हीव्हीआयपी अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले- 4 मार्च रोजी रमाबाई आंबेडकर मैदानावर आरपीआय म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भव्य जाहीर सभा होणार आहे.
- रामदास आठवलेंचे आवाहन, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर निवडणुकीत बहिष्कार टाका
मोदी सरकारमधील मंत्री आठवले म्हणाले, “आरपीआय आता बसपाची जागा घेत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची तत्त्वे पुढे नेण्यासाठी आरपीआय आणि बसपा यांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे. यातून त्यांची तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवता येतील. आमचा पक्ष दलितच नव्हे, तर सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.
यामध्ये आम्ही यशस्वीही होत आहोत. केवळ मायावतीच नाही तर बसपच्या सर्व नेत्यांनाही मी आमच्या पक्षात येण्यास सांगेन.
मुस्लिम नेतेही आरपीआयमध्ये सामील होऊ शकतात
ते म्हणाले, “भाजपमध्ये येऊ इच्छिणारे अनेक मुस्लिम नेते आरपीआयमध्ये यावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आरपीआय मजबूत होईल आणि भाजपला फायदा होईल. देशभरात दलितांची संख्या मोठी आहे. मोदी सरकार संविधान बदलेल, असे काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे लोक म्हणतात. पण तसे नाही.”
इंडिया आघाडीत आता तुटत चालली आहे
ते म्हणाले, “इंडिया आघाडी मोदीजींना पराभूत करण्यासाठी आली आहे. पण आता ती तुटत आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामुळे इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ममता दीदी, भगवंत मान हेही पंजाबमध्ये एकटे लढत आहेत. ममता दीदींना आमचे निमंत्रण आहे. आम्ही त्यांना नितीशप्रमाणे आमच्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.
आठवलेंची नजर 20% दलित मतदारांवर
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 17 जागा राखीव आहेत. तथापि, सुमारे 20% दलित व्होट बँक आहे. आठवलेंच्या माध्यमातून दलित व्होटबँक आपल्या पटलावर आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे निवडणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे. आठवले हे स्वतः महाराष्ट्राचे दलित नेते आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी ते यूपीच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला 11% मते मिळाली होती. तर 2017च्या निवडणुकीत ही मतांची टक्केवारी 22% होती.
2019च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआयने यूपीमध्ये 16 जागांवर उमेदवार उभे केले होते. गाझियाबाद, मेरठ, बिजनौर, बरेली, कानपूर नगर, अकबरपूर, फैजाबाद, कैसरगंज, डुमरियागंज, संत कबीरनगर, कुशीनगर, जौनपूर, मच्छिलशहर, मिर्झापूर आणि रॉबर्टसगंज या जागा होत्या. गेल्या लोकसभेतही आठवले यांनी यूपीमध्ये एनडीए आघाडीकडे 2-3 जागांची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांचीही भेट घेतली होती. मात्र, पक्षाने त्यांना यूपीमध्ये जागा दिली नाही.
Union Minister Ramdas Athawale’s offer to Mayawati, makes you party president in RPI!
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची माहिती
- गांधी हत्येच्या दीर्घकालीन दुष्परिणामातून भारताचे व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण ब्रिटिश अंकितच; रणजित सावरकरांचा आरोप!!
- श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहणाऱ्या इमामांविरुद्ध धमक्यांचा फतवा; इमाम आपल्या भूमिकेवर ठाम!!
- मराठा आरक्षण बलिदान (आत्महत्या) 80 बांधवांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत!!