भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. माहिती देताना जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारत आपली अंतराळ शक्ती दाखवेल. union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. माहिती देताना जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारत आपली अंतराळ शक्ती दाखवेल.
वर्ल्ड एक्स्पोमध्ये दिसेल भारताची अंतराळातील ताकद
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवकाश विज्ञान, फार्मा, रत्ने व दागदागिने, स्टार्ट-अप्स, खाद्य प्रक्रिया आणि ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात जगासमोर आपली नेतृत्वासंबंधी भूमिका भारत सादर करेल.
192 देशांचा सहभाग
1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत वर्ल्ड एक्स्पो आयोजित केला जाईल. ज्यामध्ये किमान 192 देश सहभागी होतील. महत्त्वाचे म्हणजे 2022 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनही साजरा करणार आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना दुबईमध्ये आयोजित होणाऱ्या वर्ल्ड एक्स्पोबद्दल माहिती दिली आहे.
वर्ल्ड एक्स्पोदरम्यान इस्रोच्या कर्तृत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी येथे एक विशेष प्लॉट बुक करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान भारत दुबईमधील अंतराळ संशोधनाशिवाय 11 थीम्सवर प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.
union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai
महत्त्वाच्या बातम्या
- चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये शोधले 24 नवे व्हायरस, त्यापैकी चार कोरोनासारखेच
- Novavax corona Vaccine : नोवाव्हॅक्स ९० टक्के प्रभावी, भारतात सीरम इन्स्टिट्यूट करणार निर्मिती
- कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पासपोर्ट रिन्युअलची विनंती, असे आहे प्रकरण
- संसदीय समितीने ट्विटरला बजावले समन्स, 18 जून रोजी आयटीच्या नव्या नियमांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा
- सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या!