‘हा लोकशाहीवर हल्ला आहे.’ असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Giriraj Singh उत्तर प्रदेशातील संभलमध्ये सर्वेक्षण पथकावर हल्ला केल्यानंतर राजकारण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी या घटनेवरून हल्लाचढवला आहे.Giriraj Singh
ते म्हणाले की, आता जिहादी लोकांना देशात शरिया कायदा प्रस्थापित करायचा आहे. त्यांना भारतातील लोकशाही संपवून शरिया कायदा प्रस्थापित करायचा आहे. कायद्यानुसार सर्वेक्षण पथक तेथे गेले होते, असे त्यांनी म्हटले आहे. कायद्यावर हल्ला झाला तर. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. हा लोकशाहीसह भारतावर झालेला हल्ला असल्याचे ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, देश हा हल्ला सहन करणार नाही.
गिरीराज सिंह यांनी अब्दुल्ला सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर सरकारने ज्या प्रकारे हिंदूंच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम केले आहे. तो सामाजिक सलोखा बिघडवणार आहे. फारुख अब्दुल्ला यांचे सरकार असले तरी तेथे काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसने या प्रश्नावर तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा काँग्रेसला याची जबाबदारी घ्यावी लागेल. फारुख अब्दुल्ला यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, फारुख अब्दुल्ला नेहमीच दहशतवादाचे समर्थक आहेत. हिंदूविरोधी राहिले आहेत. तिथे काँग्रेस आघाडीवर आहे, त्यामुळे काँग्रेसला देशातील जनतेची माफी मागावी लागेल.
Union Minister Giriraj Singh angry over Sambhal incident
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis आधी पक्षांतर्गत नेता, मग मुख्यमंत्री निवडू; उतावीळ माध्यमांना फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया
- Uddhav Thackeray उद्धव ठाकरे म्हणाले- हा अनपेक्षित निकाल, जनतेने कोणत्या रागातून महायुतीला मते दिली कळत नाही!!
- Maharashtra election अख्ख्या निवडणुकीत मोदींनी अनुल्लेखाने मारले; पवारांमधले “चाणक्य” महाराष्ट्राने धुळीस मिळवले!!