विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ulema Board उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या मंत्राचा प्रत्यय महाराष्ट्रात आला. मुस्लिम उलेमा बोर्डाने शरद पवार + उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या. यामध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी पाच टक्क्याची आरक्षण मर्यादा ओलांडून दुप्पट म्हणजे 10 % आरक्षणाची मागणी केली. त्याचबरोबर वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध करण्याचे लेखी आश्वासन मागून महाराष्ट्र वक्फ बोर्डासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली.Ulema Board
योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा मंत्र महाराष्ट्रातल्या जनतेला दिला. त्यावर संतापून शरद पवारांनी वेगवेगळ्या सभांमध्ये टीकेची झोड उठवली. समाजामध्ये तेढ उत्पन्न करण्यासाठी भाजप योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात फिरवत असल्याचा आरोप केला.
परंतु आता मुस्लिम उलेमा बोर्डाने शरद पवार + उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून फक्त मुस्लिमांसाठीच तब्बल 17 मागण्या करून बटेंगे तो कटेंग याचाच प्रत्यय आणून दिला.
मुस्लिम उलेमा बोर्डाने मुस्लिमांसाठी महाराष्ट्रात 5 % ऐवजी 10 % टक्के आरक्षण महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची तरतूद, महाराष्ट्रातील सगळ्या मशिदींमधल्या इमामांना दरमहा 15000 रुपये मानधन, मुस्लिम तरुणांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य, वक्फ बोर्डामध्ये 500 तरुणांची भरती, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी, रामगिरी महाराज नितेश राणे यांना तुरुंगवास आदी आश्वासनांची लेखी मागणी केली आहे. या आश्वासनांच्या बदल्यामध्ये मुस्लिम महाराष्ट्रातल्या 48 जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुस्लिम तरुणांची मोठी फौज देण्याची तयारी मुस्लिम उलेमा बोर्डाने दाखविली आहे.
Ulema Board : Letter from Muslim Ulema Board to Pawar + Thackeray + Nana; Batenge is the suffix of Kateng in Maharashtra; 1000 Crores demanded for Waqf Board!!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis व्होट जिहादविरोधात एकत्रित मतदान करण्याची गरज, विरोधकांची स्ट्रॅटेजी ओळखा; देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक भाषण
- Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नेत्यांचे पक्षातून निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारवाई
- Between the lines : अजितदादा सत्तेची वळचण सोडणार नसल्याचा पवारांचा खुलासा; दिला ईडी + सीबीआयचा हवाला!!
- Kirit Somayya : ‘व्होट जिहाद’वरून राजकारण तापले; किरीट सोमय्या यांनी केली ‘ही’ मागणी