वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी अफगाणिस्तानात आलेल्या युक्रेनियन विमानाचे अपहरण झाले आहे. युक्रेन सरकारच्या मंत्र्यांनी मंगळवारी हा दावा केला आहे. हे विमान इराणला नेण्यात आले आहे. मंत्र्याच्या मते, या विमानाचे रविवारी अपहरण करण्यात आले होते, काही अज्ञातांनी हे ताब्यात घेतले होते.ukraine plane hijacked in kabul afghanistan taliban
विमान हायजॅक करून इराणला नेले
युक्रेन सरकारमधील उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी रविवारी विमानाचे अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची माहिती दिली आहे. मंगळवारी हे विमान इराणला नेण्यात आले आहे, ज्यात अज्ञात लोक आहेत. एवढेच नाही तर आमचे इतर तीन बचाव मोहिमाही यशस्वी झाल्या नाहीत, कारण आमचे लोक विमानतळावर पोहोचू शकले नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.
युक्रेनच्या दाव्यानंतर इराणचे मंत्री अब्बास असलानी यांचा म्हटले आहे की, हे विमान ईशान्य इराणमधील मशहाद विमानतळावर आले होते, परंतु ते इंधन भरल्यानंतर युक्रेनला रवाना झाले आणि कीव विमानतळावरही उतरले.
अफगाणिस्तानात अजूनही 100 युक्रेनियन नागरिक
वृत्तसंस्थेनुसार, ज्यांनी हे विमान हायजॅक केले त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे होती. हे विमान कोणी हायजॅक केले हे अद्याप समजू शकलेले नाही. युक्रेन आपल्या लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 83 लोकांना काबूलहून कीवमध्ये आणण्यात आले आहे. यामध्ये 31 युक्रेनियन नागरिकांचा समावेश होता. अफगाणिस्तानात अजूनही 100 हून अधिक युक्रेनियन नागरिक आहेत, ज्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून काबूल विमानतळावरून लोकांना वाचवले जात आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, युक्रेन, भारतासह जगातील अनेक देश आपापल्या नागरिकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत. नाटो देशांबरोबरच अमेरिकेने काबूल विमानतळावर नियंत्रण ठेवले आहे. त्यांच्या मदतीने या लोकांची सुटका केली जात आहे.
ukraine plane hijacked in kabul afghanistan taliban
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : पाकिस्तानी नेत्यांनी तोडले अकलेचे तारे, इम्रान खान यांचे निकटवर्तीय म्हणाले- ‘तालिबान आम्हाला भारताकडून काश्मीर जिंकून देणार!’
- मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम, महापौरपदासाठी काँग्रेसकडून रितेश देशमुखच्या नावाची चर्चा!
- चंद्रकांतदादांची सबुरीची भाषा, तरीही नारायण राणे आक्रमकच; गुन्हाच केलेला नाही तर ते काय अटक करणार?, आमचे सरकार त्यांच्या “वरती” बघून घेऊ
- दाेन चार दगड मारून गेले यात कसला पुरुषार्थ, बदनामी केली तर गुन्हा दाखल करेल, नारायण राणे यांचा इशारा
- नाशिकमध्ये भाजपच्या बंद कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक; काचा फोडल्या