• Download App
    आसाममध्ये दोन प्रवासी बोटी एकमेकांना धडकल्या, ८४ प्रवाशांचा वाचविण्यात यश । Two boats trashed in Asaam

    आसाममध्ये दोन प्रवासी बोटी एकमेकांना धडकल्या, ८४ प्रवाशांचा वाचविण्यात यश

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील ८७ पैकी ८४ जणांचा बचाव करण्यात यश आले आहे. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. आसाममधील जोरहाट जिल्ह्यात निमती घाटाजवळ हा अपघात सायंकाळी घडला. Two boats trashed in Asaam

    ‘माँ कमला’ ही खासगी बोट माजुली येथे जात होती. त्याचवेळी माजुलीहून येणाऱ्या ‘त्रिपकाई’ या सरकारी फेरीबोटीशी तिची निमती घाट येथे धडक बसली. धडकेनंतर ‘माँ कमला’ बोट पाण्यात उलटून बुडाली. बोटीवर १२० हून अधिक लोक होते.



    शोधमोहिमेदरम्यान एका महिलेचा मृतदेह सापडला. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर उलटलेल्या बोटीचे अवशेष एनडीआरएफच्या पाणबुड्यांना सापडले.

    या बोटीचा तळ कापला गेलेला होता. पण बोटीत एकही प्रवासी आढळला नाही. जोरहाट आणि माजुली जिल्ह्यांमधील वेगवेवगळ्याप गावांतील रहिवासी असलेल्या ८४ जणांचा बचाव करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वव सरमा यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

    Two boats trashed in Asaam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे