• Download App
    जम्मूतही होणार 'गोविंदाSS गोविंदाSS'चा गजर, तिरुपती संस्थान बांधणार बालाजी मंदिर, 40 वर्षांसाठी लीझवर जमीन । TTD Sansthanam will build Balaji Temple in Jammu, land leased for 40 years

    जम्मूतही होणार ‘गोविंदाSS गोविंदाSS’चा गजर, तिरुपती संस्थान बांधणार बालाजी मंदिर, 40 वर्षांसाठी लीझवर जमीन

    Balaji Temple in Jammu : जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी मंदिर आणि संबंधित इमारतींच्या बांधकामासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला जवळपास 25 हेक्टर जमीन 40 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. TTD Sansthanam will build Balaji Temple in Jammu, land leased for 40 years


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी मंदिर आणि संबंधित इमारतींच्या बांधकामासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला जवळपास 25 हेक्टर जमीन 40 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

    नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. एका सरकारी प्रवक्त्यानुसार, 25 हेक्टर जमिनीवर भाविकांच्या सोयीसाठी एक कॅम्पस, वेद पाठशाळा, आध्यात्मिक / योग केंद्र, एक कार्यालय, निवासी परिसर आणि पार्किंग क्षेत्र असेल.

    ते म्हणाले की, भविष्यात वैद्यकीय व शिक्षण केंद्रेही बांधली जातील. तामिळनाडू सरकारने टीटीडी अधिनियम 1932 अन्वये टीटीडीची स्थापना केली आहे. ही एक सेवाभावी संस्था आहे आणि आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवते.

    प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये टीटीडीच्या आगमनामुळे पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. विशेषत: जम्मूला मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते, त्यामुळे भाविकांच्या पर्यटनात वाढ होईल. पर्यटनात वाढ झाल्याने आर्थिक उलाढालीही वाढतील.

    TTD Sansthanam will build Balaji Temple in Jammu, land leased for 40 years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच