• Download App
    Sukanta Majumdar भाजप राज्याचे ध्रुवीकरण करू इच्छित आहे हा आरोप चुकीचा आहे, असंही म्हणाले आहेत.

    Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार

    भाजप राज्याचे ध्रुवीकरण करू इच्छित आहे हा आरोप चुकीचा आहे, असंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : मुर्शिदाबादमधील हिंसाचारावरून भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल भाजप युनिटचे अध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी आरोप केला आहे की टीएमसी नेत्यांकडे वक्फमध्ये जमीन आहे, ज्यामुळे राज्य सरकारच्या इशाऱ्यावर कायद्याला विरोध केला जात आहे. एनडीटीव्हीशी झालेल्या विशेष संभाषणात सुकांता मजुमदार म्हणाले की, जोपर्यंत ममता बॅनर्जींना वाटत नाही तोपर्यंत राज्यातील हिंसाचाराच्या घटना कमी होणार नाहीत.

    सुकांता मजुमदार यांनी आरोप केला की, ममता बॅनर्जी या माध्यमातून आपली ताकद दाखवत आहेत. यामागील रहस्य म्हणजे कोलकात्ता आणि पश्चिम बंगालमधील इतर अनेक ठिकाणी वक्फ मालमत्ता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहे.

    तसेच ते म्हणाले की, भाजप राज्याचे ध्रुवीकरण करू इच्छित आहे हा आरोप चुकीचा आहे. ते म्हणाले की जर बंगालमध्ये ध्रुवीकरण झाले तर त्याचा फायदा भाजपला नाही तर तृणमूल काँग्रेसला होईल. बंगालमध्ये मुस्लिमांचे १०० टक्के ध्रुवीकरण झाले आहे, तर हिंदूंचे ध्रुवीकरण झालेले नाही. त्यांनी असेही म्हटले की ही दंगल मुस्लिम बहुल भागात झाली. हिंदू भागात दंगली झालेल्या नाहीत. त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि आमदार आहेत.

    Trinamool leaders have Waqf land, that’s why they are inciting violence said Sukanta Majumdar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’

    मुर्शिदाबाद मध्ये NCW अध्यक्षांसमोर दंगल पीडित महिलांचा प्रचंड आक्रोश; त्यांचे दुःख आणि वेदना मांडायला शब्द अपुरे!!

    Election Commission : निवडणूक आयोग AIच्या वापरासाठी गाइडलाइन आणणार; बिहार विधानसभा निवडणुकीत दिसणार झलक