विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसाममध्ये ८०० चहामळे असून तेथे लसीकरणाची मोहीम खूपच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे चहामळ्यात कोरोना संसर्ग वाढीचे प्रमाण सुमारे ३०० टक्क्याहून अधिक राहिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. Tree estate become corona centers in Assam
राज्यातील चहामळ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे २५ लाख लोक कार्यरत आहेत. एवढी प्रचंड संख्या असूनही लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. या भागात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवल्यास कोरोनाचा प्रसार होणार नाही. आसाममध्ये ६ लाख प्रत्यक्ष मजुर असून त्यापैकी ४४ हजार जणांना पहिला डोस मिळाला तर ३ हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
याशिवाय कोविड केअर सेंटरची संख्या देखील अपुरी आहे. ३७० चहामळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यापैकी २७१ ठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी केल्याचा राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने दावा केला आहे.
३१ मे पर्यंत राज्यातील ३७० चहामळ्यात काम करणाऱ्या ६,१४६ मजुरांना कोरोनाची लागण झाली तर ४३ जणांचा मृत्यू झाला. १९ मेपर्यंत एकूण १८५१ जणांना लागण झाली होती तर २२० चहामळ्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
चहामळ्यातील मजुर शिक्षित आणि सजग नसल्याने ते अत्यल्प वेतनावर काम करतात. सरासरी महिनाकाठी ७ हजार रुपये वेतनावर काम करतात. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के असलेल्या मजुरांवर अस्वच्छतेमुळे कोरोना संकटाची टांगती तलवार आहे.
Tree estate become corona centers in Assam
महत्त्वाच्या बातम्या
- कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेट वर पाहिजे म्हणणाऱ्या जाहिरातीतील सत्य काय आहे?
- पर्यावरण बदलाचा वन्यप्राण्यांच्या जननक्षमतेवरही होतोंय परिणाम
- बाबा रामदेवांच्या कोरोननिलबाबत फेक न्यूज, नेपाळने बंदी घातली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट
- महाराष्ट्र सरकारचे कोरोना व्यवस्थापन!, बऱ्या झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे घरच्यांना कळविले
- अभ्यासात सतत घोकंपट्टी करणे चुकीचेच