• Download App
    Tokyo Olympics Updates : मनु भाकरे सिमरनजीत कौरकडून निराशा : दीपिका कुमारी क्वार्टरफायनमध्ये- पदकापासून केवळ एक पाऊल दूर। Tokyo Olympics Updates: Disappointment from Manu Bhakre Simranjit Kaur: Deepika Kumari in quarterfinals - just one step away from medal

    Tokyo Olympics Updates : मनु भाकरे सिमरनजीत कौरकडून निराशा : दीपिका कुमारी क्वार्टरफायनमध्ये- पदकापासून केवळ एक पाऊल दूर

    • रशियाच्या केस्नियावर केली मात, उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाचं खडतर आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. रशियाच्या केस्निका पेरोव्हावर अटीतटीच्या लढतीत ६-५ ने मात करत दिपीकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिरंदाजीत किमान कांस्यपदक मिळवण्यासाठी दिपीकाला आता एका विजयाची तर सुवर्णपदकासाठी दोन विजयांची गरज आहे.  Tokyo Olympics Updates: Disappointment from Manu Bhakre Simranjit Kaur: Deepika Kumari in quarterfinals – just one step away from medal

    1/8 Eliminations च्या पहिल्याच सेटची दिपीकाने चांगली सुरुवात केली. २८-२५ च्या फरकाने पहिला सेट जिंकत दिपीकाने २ सेट पॉईंट जिंकले. परंतू दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या केस्नियाने बरोबरी साधत सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दिपीकाने आपला सर्व अनुभव पणाला लावत २८-२७ अशी एका गुणाच्या फरकाने बाजी मारली.



    परंतू रशियाच्या केस्नियाने चौथा सेट बरोबरी सोडवत आणि पाचव्या सेटमध्ये ३ गुणांच्या फरकाने सेट जिंकत पुन्हा एकदा सामना बरोबरीत सोडवला. अखेरीस निकाल शूट ऑफमध्ये घेण्यात आला. ज्यात रशियाच्या केस्नियाने ७ तर दिपीकाने १० गुणांची कमाई करत आपला विजय निश्चीत केला. उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाच्या अॅन सॅनचं आव्हान असणार आहे.

    Tokyo Olympics Updates : Disappointment from Manu Bhakre Simranjit Kaur: Deepika Kumari in quarterfinals – just one step away from medal

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे