• Download App
    लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार TMC : विरोधी ऐक्याच्या प्रचाराला सुरुंग, ममता म्हणाल्या- आमची आघाडी जनतेशीच|TMC will fight the Lok Sabha elections alone Opposition unity campaign is a tunnel, Mamata said - Our alliance is with the people

    लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार TMC : विरोधी ऐक्याच्या प्रचाराला सुरुंग, ममता म्हणाल्या- आमची आघाडी जनतेशीच

    वृत्तसंस्था

    कोलकाता : एकीकडे विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याची मोहीम राबवत आहेत. त्याचवेळी, तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) विरोधी एकजुटीच्या या मोहिमेपासून स्वतःला दूर केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला आहे.TMC will fight the Lok Sabha elections alone Opposition unity campaign is a tunnel, Mamata said – Our alliance is with the people

    2024 च्या निवडणुका आपण एकट्याने लढवणार असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही. टीएमसीची युती जनतेसोबत असेल, असे त्या म्हणाल्या.



    ममतांचे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या बुधवारी (1 मार्च) व्यासपीठावरून विरोधी एकजुटीचे उदाहरण समोर आले. व्यासपीठावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

    ममता म्हणाल्या- ज्यांना भाजपचा पराभव करायचा आहे ते तृणमूलला मतदान करतील

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या- ज्यांना भाजपचा पराभव करायचा आहे, ते आमच्या बाजूने मतदान करतील असा मला विश्वास आहे. जनता आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतही असेच घडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

    वास्तविक, बंगालच्या मुख्यमंत्री त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात बोलत होत्या. ममता म्हणाल्या- जे सीपीआय(एम) आणि काँग्रेसला मतदान करत आहेत, ते प्रत्यक्षात भाजपलाच मतदान करत आहेत. हे सत्य आजच समोर आले आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत टीएमसीला एकही जागा मिळालेली नाही.

    भाजपने सागरदिघी विधानसभा मतदारसंघाची मते काँग्रेसकडे हस्तांतरित केली – ममता

    सागरदिघीमध्ये काँग्रेस-डाव्या आघाडीच्या उमेदवाराच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, सागरदिघी विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली मते काँग्रेसकडे हस्तांतरित केली. सागरदिघी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बायरन बिस्वास यांचा सुमारे 23 हजार मतांनी विजय झाल्यानंतर ममता यांचे वक्तव्य आले आहे.

    ममता यांना यूपीएचा भाग व्हायचे नाही

    टीएमसीने काँग्रेसवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. एकेकाळी ममता बॅनर्जींनी तर यूपीए म्हणजे काय, आता कोणतीही यूपीए नाही, असंही म्हटलं होतं. आम्हाला एक मजबूत पर्याय हवा आहे. हे विधान ममता यांनी गेल्या वर्षी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीदरम्यान केले होते.

    TMC will fight the Lok Sabha elections alone Opposition unity campaign is a tunnel, Mamata said – Our alliance is with the people

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य