वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 7 जानेवारी 2024 रोजी बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेथे राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाने सुरक्षित आणि शांततेने राहता यावे यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगला मतदान दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर सुरू हल्ल्यानंतर समोर आले की, शेख हसीना सरकार अल्पसंख्यकांवर कट्टरपंथी हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे. निवडणुकांनंतर नवीन सरकार आल्यानंतरही हिंदूंवर हल्ले थांबले नाहीत. अल्पसंख्याक संघटनांचा दावा आहे की, दरमहा ३ हल्ले होत आहेत. शेख हसीना पाचव्यांदा पीएमची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशच्या ६ जिल्ह्यांत (कुश्तिया, बागेरहाट, जेनैदाह, गैबांधा, चटगाव आणि सिलहट) हिंदूंवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत.Three attacks per month on Hindus after Bangladesh elections; Hasina government fails to stop attacks on minorities
हल्ले रोखण्यासाठी कारवाई गरजेची : अल्पसंख्याक संघटना
हिंदू बौद्ध ख्रिश्चन ओइक्या परिषदेचे सदस्य रंजन-करमाकर म्हणाले, निवडणुकांनंतर अल्पसंख्याक आणि मंदिरावर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. या प्रकरणात कारवाई न होणे आणि आरोपींना शिक्षा न झाल्याने अनेक कट्टरपंथी संघटनांचे धाडस वाढत आहे. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे.
Three attacks per month on Hindus after Bangladesh elections; Hasina government fails to stop attacks on minorities
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या मातीत हाणली पवारांची कॉपी!!; कोण कुणाच्या हातात काय देणार??, विचारणा केली!!
- Salman Khan Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या!
- मोदींच्या महाराष्ट्र मोहिमेनंतर योगींची दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी!!; सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत तुफानी सभा!!
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने EVM-VVPAT शी संबंधित प्रोटोकॉल बदलला!