UNFPA च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या सुमारे 140 कोटींवर पोहोचली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन राहिला नसून भारत झाला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या आता जगातील सर्वात मोठी आहे. UNFPA च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या सुमारे 140 कोटींवर पोहोचली आहे आणि हा आकडा चीनच्या लोकसंख्येपेक्षा सुमारे 2 दशलक्ष अधिक आहे. This is the population of those who give birth to dozens of children comments of Union Minister Giriraj Singh
आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी देशातील वाढत्या लोकसंख्येवर मोठे विधान केले आहे. ही वाढती लोकसंख्या संपूर्ण देशासाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले. गिरीराज सिंह म्हणाले, “वाढती लोकसंख्या भारताच्या सर्वांगीण विकासाला धोका आहे. आमची संसाधने मर्यादित आहेत. आज देशात सुमारे 150 जिल्हे आहेत जेथे जननक्षमतेचे प्रमाण वाढले आहे, ही लोकसंख्या कोणाची आहे? ही लोकसंख्या त्यांची आहे जे डझनभर मुलांना जन्म देतात, ही विशिष्ट समुदायाची आहे.’’
UNFPA चा ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023’ हा ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’ या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता 1,428.6 दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या 1,425.7 दशलक्ष आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये 2.9 दशलक्ष इतका फरक आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीतील फूट : पवारांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे टायटल आहे, “ऑन माय टर्म्स”; पण मोदी – शाह कधी इतरांच्या टर्म्सवर राजकारण करतात??
- मराठी माध्यमांनी रचला महाविकास आघाडीच्या यशाचा इमला; विनोद तावडेंनी ढासळवला त्याच्या अहवालाचा पाया!!
- ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!
- राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अतीक अहमद हत्येवर शरद पवारांचे सूचक भाष्य; यंत्रणांनी कायदा हातात घेऊ नये!!