• Download App
    दिल्लीत तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार । There will be three days of intense heat wave in Delhi

    दिल्लीत तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मंगळवारी राजधानीत हंगामातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असून आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची आशा नाही. तापमान आणखी वाढेल आणि बुधवारी ते ४० अंशांवर जाऊ शकते. There will be three days of intense heat wave in Delhi

    यंदा मार्चमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे उष्मा वाढला आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दिल्लीत साधारणपणे मार्च महिन्यात सरासरी १५.९ मिमी पाऊस पडतो. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे गेल्या १३ वर्षांतील सर्वोच्च तापमान आहे.

    हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र जेनामानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीतील काही भागात उष्णतेची लाट होती. राष्ट्रीय राजधानीतील सफदरजंग येथील अधिकृत तापमान निर्देशांक वेधशाळेने कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदवले. ते हंगामाच्या सरासरीपेक्षा सात अंशांनी जास्त आहे. त्याच वेळी, किमान तापमान १८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सामान्यपेक्षा एक जास्त आहे. तर आर्द्रतेची पातळी ७९ ते १४ टक्क्यांच्या दरम्यान होती.



    पठारी भागात जेव्हा तापमान ४० अंशांच्या वर पोहोचते. सामान्यपेक्षा ४.५ अंश जास्त असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते. नरेला सर्वात उष्ण क्षेत्र होते. दिल्लीच्या बाहेरील नरेला हे ४१.७ अंशांसह सर्वात उष्ण होते. त्याच वेळी, पीतमपुरा येथे ४१.४ लोधी गार्डन ४०.१ रिज येथे ४०.२ होते. गुरुग्राममध्ये ४०.८ आणि फरिदाबादमध्ये ४०.७ अंश कमाल तापमान होते.

    एप्रिलपूर्वी पारा वाढण्याची शक्यता असून उत्तर भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की ईशान्य भारताच्या काही भागात पुढील पाच दिवसांत मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    ३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत आसाम-मेघालय आणि अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. २९ ते ३० मार्च दरम्यान दक्षिण हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू विभागातील काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते.

    There will be three days of intense heat wave in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार