वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात तिसरी आघाडी उभे राहणे शक्य नाही, अशा स्पष्ट शब्दांत ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राजधानी नवी दिल्लीतून विरोधी पक्षांच्या ऐक्याला सुरुंग लावला आहे.There is no possibility of a Third front as far as I am concerned: Odisha CM Naveen Patnaik after his meeting with PM Narendra Modi
एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजच महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. देशपातळीवरच्या विरोधी ऐक्यासाठी त्या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि दुसरीकडे नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देशात तिसरी आघाडी उभी राहणे शक्य नसतेचे वक्तव्य केले.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निकाल लागत असताना नितीश कुमार आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे दोन्ही नेते आज मुंबईत होते. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली. देशातल्या सर्व विरोधी पक्षांचा शरद पवार हे “चेहरा” बनू शकतात का?, असा प्रश्न पत्रकारांनी नितीश कुमार यांना पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी विचारला. त्यावर सध्या “विरोधकांचा चेहरा” या विषयावर चर्चा झाली नाही, तर फक्त विरोधकांच्या ऐक्याविषयी चर्चा झाली, असे उत्तर पवारांनी दिले.
पण मुंबईत विरोधी पक्षांचा ऐक्याचे असे मंथन सुरू असताना दुसरीकडे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. ओरिसातील जगन्नाथ पुरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात त्यांनी मोदींशी चर्चा केली. त्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर तशी आघाडी उभे राहणे शक्य नाही. आपला त्या आघाडीशी काही संबंध नाही, असे उत्तर देऊन पटनाईक निघून गेले.
म्हणजे इकडे नितीश कुमार, ठाकरे आणि पवार मुंबईत विरोधी पक्षांचे ऐक्य साधत असताना तिकडे दिल्लीत नरेंद्र मोदींनी न बोलता आणि नवीन पटनाईक यांनी बोलून त्या ऐक्याला सुरुंग लावला.
There is no possibility of a Third front as far as I am concerned: Odisha CM Naveen Patnaik after his meeting with PM Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरवर लवकरच करता येईल व्हिडिओ-ऑडिओ कॉल, एलन मस्क यांची घोषणा, नंबरची एक्सचेंज न करता बोलू शकाल
- धर्माशी संबंधित राजकीय पक्षांच्या नावावर सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राकडून 4 आठवड्यांत मागवले उत्तर
- सत्तासंघर्षावर आज निकाल, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठातील युक्तिवाद 16 मार्चला झाला होता पूर्ण; राज्यपालांचा आदेश रद्द होणार का? वाचा सविस्तर
- बँकांमध्ये 35,000 कोटींच्या ठेवी पडून, दावा करणारा कोणीही नाही; केंद्र सरकार आता अशा प्रकारे करणार परत, योजना तयार