विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदू धर्माची शिकवण देण्यासाठी कोणाचाही धर्म बदलविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या लोकांचाही धर्म कोणाला बदलवू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.There is no need to change religion to teach Hinduism; But don’t let your people change their religion, Sarsanghchalak’s appeal
छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मदकू बेटावर आयोजित ३ दिवसीय घोष शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. भागवत म्हणाले, कलयुगात भारताला विश्व गुरू करण्यासाठी एकत्र येऊन वाटचाल करण्यासाठी संघटना महत्वाची आहे. भारतीय समाजात खूप विविधता आहे. येथे अनेक देवी-देवता आहेत.
असं असलं तरी प्रत्येकाला सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे. हीच प्रक्रिया मागील अनेक शतकांपासून सुरू आहे. हिंदू धमार्ची शिकवण कुणाचंही धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न न करता जगाला देण्याची गरज आहे. भारतातील हिंदू धर्म सत्य आहे आणि आपल्या देशाने हा सत्याचा मार्ग जगाला दाखवला पाहिजे.
कलयुगात जे कमकुवत आहेत केवळ त्यांचंच शोषण होते असे सांगून सरसंघचालक म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी देखील कमकुवतपणा हा शाप असल्याचे म्हटले आहे. शक्ती म्हणजे संघटीतपणे जगणे आहे. एकटा व्यक्ती कधीच शक्तीशाली असू शकत नाही. कलयुगात संघटन हीच शक्ती आहे. आपल्याला प्रत्येकाला एकत्रित आणले पाहिजे. त्यासाठी त्यांना बदलवण्याची गरज नाही.
There is no need to change religion to teach Hinduism; But don’t let your people change their religion, Sarsanghchalak’s appeal
महत्त्वाच्या बातम्या
- पक्ष चालवायचा म्हणुन पवार हे देशमुखांचे समर्थन करतात, पण त्यांच्यासारख्या नेत्याने हे करणे अपेक्षित नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा