…तर पीओके देखील भारताचा एक भाग होईल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपला 300 जागा मिळाल्यावर त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधले आणि यावेळी जर भाजप लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्यात यशस्वी ठरला तर कृष्णजन्मभूमी मथुरा आणि वाराणसीमध्ये मंदिर बनवले जाईल. तसेच, आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके देखील परत घेतले जाईल.There is a need to cross four hundred to build temples in Mathura and Varanasi Himanta Biswa Sarma
हिमंता सरमा म्हणाले की, ‘जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की एक काश्मीर भारतात आहे आणि दुसरे पाकिस्तानमध्ये आहे. पीओके खरोखर आमचा आहे यावर संसदेत कधीही चर्चा झाली नाही. सध्या पीओकेमध्ये दररोज निदर्शने होत आहेत आणि पाकिस्तानमधील लोक भारताचा तिरंगा झेंडा घेऊन पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. जर मोदीजींना 400 जागा मिळाल्या तर पीओके देखील भारताचा एक भाग होईल आणि हे देखील सुरू झाले आहे.
पीओकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. पिठाच्या वाढत्या किमती, वीज बिलांचे वाढलेले दर, अनुदानात कपात अशा मागण्या घेऊन पीओकेचे लोक पाकिस्तान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेमध्ये सुरू असलेल्या गदारोळावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की पीओके हा भारताचा भाग होता आणि नेहमीच राहील.
There is a need to cross four hundred to build temples in Mathura and Varanasi Himanta Biswa Sarma
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्हालाही मोदींसारख्या नेत्याची गरज आहे कारण…’, पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपतीने केले कौतुक!
- देशात मोदी “लहर” नाही, मोदी “जहर”; काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची घसरली जीभ!!
- पुणे जिल्ह्याच्या नारायणगावमधून महादेव बेटिंग ॲपची “करामत”, एकाच बिल्डिंग मधून 70 – 80 जण पोलिसांच्या ताब्यात!!
- केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधियांना मातृशोक; माधवी राजे यांचे निधन