• Download App
    ‘’पंतप्रधान मोदींमुळे जगाने भारताची ताकद ओळखली’’ चंद्राबाबू नायडूंचे विधान, उडवणार विरोधकांची झोप! The world recognized Indias strength because of Prime Minister Modi  Chandrababu Naidu

    ‘’पंतप्रधान मोदींमुळे जगाने भारताची ताकद ओळखली’’ चंद्राबाबू नायडूंचे विधान, उडवणार विरोधकांची झोप!

    त्यांच्याकडून निघणारे कौतुकाचे शब्द निव्वळ प्रतिक्रिया नसून भविष्यातील राजकारणाचा मोठा संदेश देत होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ‘टीडीपी’चे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे आज जे विधान समोर आले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एवढच नाही तर चंद्राबाबू नायडूंचे हे विधान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या विरोधकांची झोप उडवणार असल्याचंही दिसत आहे. The world recognized Indias strength because of Prime Minister Modi  Chandrababu Naidu

    एनडीएचे माजी सहयोगी नायडू यांनी रिपब्लिक समिट 2023 च्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार प्रशंसा केली. त्यांच्याकडून निघणारे कौतुकाचे शब्द निव्वळ प्रतिक्रिया नसून भविष्यातील राजकारणाचा मोठा संदेश देत होते.

    नायडू रिपब्लिक समिटमध्ये व्हर्चुअली सामील झाले. ‘Technocracy for democracy’ या सत्रात तंत्रज्ञान, भारताचा यूएसपी आणि विकास यासंदर्भातील प्रश्नाबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींचे व्हिजन सर्वोत्तम असल्याचे सांगितले. ते उघडपणे काही बोलले नाही. पण हसतमुखाने गोष्टी टाळण्याच्या कलेमध्ये पारंगत असलेल्या नायडू हे पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचे समर्थन करतात आणि त्यांना पाठिंबा देतात हे दर्शवण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत.

    वसुधैव कुटुंबकम उक्तीच्या आधारे पंतप्रधान ज्याप्रमाणे एक राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट राष्ट्र असल्याचे सांगतात त्याच धर्तीवर भारताला नंबर वन बनवण्याची इच्छा चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना नायडू म्हणाले- ‘पंतप्रधान मोदींनी भारताला प्रोत्साहन दिले आणि जगानेही भारताची ताकद ओळखली आहे. मी पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाशी सहमत आहे. ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी मी तेलंगणातील लोकांना प्रेरणा देईन. भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश व्हावा, असे आपले सर्वांचे स्वप्न आहे. आपण सामूहिक प्रयत्न केले तर भारत जगातील नंबर एक देश बनू शकतो.’’

    The world recognized Indias strength because of Prime Minister Modi  Chandrababu Naidu

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही