• Download App
    ओलिसांची सुटका होईपर्यंत गाझामध्ये युद्धविराम नाही अन् इंधन पुरवठाही नाही – नेतान्याहूंनी स्पष्ट केली भूमिका!|The war in Gaza will not stop until the hostages are released Netanyahu clarified

    ओलिसांची सुटका होईपर्यंत गाझामध्ये युद्धविराम नाही अन् इंधन पुरवठाही नाही – नेतान्याहूंनी स्पष्ट केली भूमिका!

    • इराण समर्थित हिजबुल्लाहलाही दिला कडक इशारा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

    विशेष प्रतिनिधी

    तेल अवीव: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे की, हमास दहशतावादी गटांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायलींची सुटका होईपर्यंत गाझाला कोणतेही इंधन पुरवठा केला जाणार नाही आणि हमासशी युद्धविराम होणार नाही.The war in Gaza will not stop until the hostages are released Netanyahu clarified

    इस्रायलच्या हमाससोबतच्या युद्धाच्या एक महिन्याच्या पूर्तीच्या निमित्ताने एका वक्तव्यात पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराण समर्थित हिजबुल्लाहला इशारा दिला की जर त्यांनी लेबनॉनमधील तळावरून युद्धात नवीन आघाडी उघडली तर ते “आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करतील.’’


    Israel Hamas War : हमासने दोन अमेरिकन ओलिसांची सुटका केली, ब्लिंकन यांनी मध्यस्थीसाठी मानले कतारचे आभार


    इस्रायल-हमास युद्ध 7 ऑक्टोबर रोजी सुरू झाले जेव्हा इस्लामी गट हमासचे हल्लेखोर गाझा पट्टीतून निघून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, 1948 मध्ये देशाच्या अस्तित्वानंतरच्या सर्वात वाईट हल्ल्यात हमासच्या हल्लेखोरांनी अंदाजे 1,400 लोक आणि त्याचवेळी 240 हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते.

    याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने पॅलेस्टिनी प्रदेशात सुमारे २४ लाख लोक राहत असलेल्या हमासवर जोरदार हल्ला चढवला आहे. तथापि, संघर्ष आता दुसर्‍या महिन्यात प्रवेश करत असताना, युद्धविराम करण्याचे आंतरराष्ट्रीय आवाहन वाढत आहे. परंतु नेतन्याहू म्हणाले की “आमच्या ओलीस नागिरांना सोडल्याशिवाय तेथे इंधन पुरवठा होणार नाही आणि युद्धविरामही होणार नाही”

    The war in Gaza will not stop until the hostages are released Netanyahu clarified

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NSA Doval : NSA डोभाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट; म्हणाले- दहशतवादाविरुद्ध लढणे आवश्यक

    आणीबाणीच्या काळ्या पर्वावरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; पण इंदिरा गांधींनी come back कसे केले सांगण्यावर काँग्रेसचा भर!!

    Mumbai Delhi Airports : मुंबई-दिल्लीसारख्या विमानतळांवर मोठ्या सुरक्षा त्रुटी; DGCAने म्हटले- धावपट्टीवरील मार्किंग अस्पष्ट