विशेष प्रतिनिधी
दिल्ली : ट्विटरवर सध्या एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या 15 वर्षांच्या टाॅक्झिक रिलेशनशिपमधून बाहेर पडून एका स्त्रीने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि तिच्या मुलीने याबद्दलचा आनंद ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे. सुरुवातीला या मुलीला आपल्या फॅमिलीमध्ये कुणीतरी वेगळी व्यक्ती येणार हे मान्य होत नव्हते. पण हे अगदीच क्षणिक होतं. तिने अतिशय आनंदाने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा स्वीकार केला आहे. आणि त्याबाबत ती प्रचंड खूश आहे. आणि तिच्या या अॅटिट्यूडमुळे तिच्या आईने तिला एक अंगठी देखील गिफ्ट दिली आहे. सध्या ट्विटरवर याच गोष्टींची चर्चा चालू आहे.
The girl was happy with her mother’s decision to remarry after leaving her 15-year-old Toxic relationship
जवळपास सर्व स्त्रियांना असे सांगितले जाते(संस्कार) की, लग्न टिकवणे, पूर्णत्वाला नेणे जी बाईची जबाबदारी असते. नवरा कसाही असो, तू खंबीर उभी रहा. अरे पण कोणत्या गोष्टी साठी खंबीर हो? होणारा त्रास सहन करण्यासाठी? मनाची कितीही कुचंबणा होत असेल तरीही समाज काय म्हणेल म्हणून आहे त्या त्रासदायक नात्यात ‘टिकून’ राहण्यासाठी?
संस्कृती रक्षणासाठी पुढे येणारे हात तिच्या रक्षणाला का नाही पुढे आले?
लग्न म्हणजे एक शर्यतच आहे आणि तुम्हाला काहीही करून ती शर्यत जिंकायची आहे. अशाप्रकारचे लग्नाचे स्वरूप आजकाल किंवा बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे. एखाद्या स्त्रीचा डिवोर्स झाला किंवा तिचा नवरा अचानक वारला तर स्त्रीचं आयुष्य तिथेच संपून जाते.
एखाद्या पुरुषाच्या बायकोचे जर काही कारणाने निधन झाले तर, दुसर्या दिवशी पाहुणे पै त्या पुरुषांसाठी दुसरी बायको शोधण्याच्या कामाला लागतात. कारण काय? तर म्हणे पुरुष एकटे राहू शकत नाही. त्यांना आधार हवा असतो. खाण्या पिण्याची आबाळ होते. मग जर एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले तर तिला आधार नको असतो का? जर एखाद्या स्त्रीचा नवऱ्याचे निधन झाले तर ‘आता तुझं आयुष्य तर पूर्णपणे खराब झालं’ हे वाक्य बोलून सहानुभूती देण्या खेरीज दुसरं काहीही लोक आणि नातेवाईक करत नाहीत. जर एखाद्या स्त्रीचा नवरा व्यसनी असेल, ते रिलेशनशिप टॉक्सिक असेल तर ‘काय आता नशीबाने भोग दिलेत, कर सहन. मुलं आहेत, मुलांकडे बघून लग्नात राहा’ असे फालतू सल्ले समाजाकडून दिले जातात. हा भेदभाव का?
The girl was happy with her mother’s decision to remarry after leaving her 15-year-old Toxic relationship
महत्त्वाच्या बातम्या
- जगमित्र साखर कारखान्यासाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? ;किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल
- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना दिली सशर्त मंजुरी ; रुपाली चाकणकर यांनी केले सर्व बैलगाडा मालक व गाडा शौकीनांचे मनःपूर्वक अभिनंदन
- राहुलजींच्या हिंदूकरणाचा पुढचा टप्पा; भर सभेत वैदिक स्वस्तिमंत्र पठण…!!; कधी?, कुठे??
- मेथीच्या भाजीवर फिरवला रोटर येवल्यात धक्कादायक घटना