• Download App
    लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा पहिला भाग The first episode of PM Modis Mann Ki Baat after the Lok Sabha elections

    लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चा पहिला भाग

    या आधी पंतप्रधान मोदींनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी मन की बात कार्यक्रमाच्या 110 व्या भागाला संबोधित केले होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागातून जनतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम चार महिन्यांनंतर प्रसारित झाला आहे. यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी मन की बात कार्यक्रमाच्या 110 व्या भागाला संबोधित केले होते. The first episode of PM Modis Mann Ki Baat after the Lok Sabha elections

    आज 111 व्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमातून लोकांना संबोधित केले. वास्तविक, लोकसभा निवडणुकीमुळे हा कार्यक्रम थांबवण्यात आला होता. ज्याची घोषणा खुद्द मोदींनी केली होती. लोकसभा निवडणुकीमुळे मन की बात कार्यक्रम पुढील तीन महिने येणार नसल्याचे मोदी म्हणाले होते.



     

    पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी देखील आभार मानले, मोदी म्हणाले की आज मी देशवासियांचे देखील आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशाच्या लोकशाही प्रणालींवर त्यांचा अतूट विश्वास पुन्हा दाखवला आहे. 2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती, एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही. ज्यामध्ये 65 कोटी लोकांनी मतदान केले आहे. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो.

    मोदी म्हणाले की फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत जेव्हा-जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा तेव्हा मला तुमच्याशी हा संवाद खूप आठवायचा, पण तुम्ही हे देखील मला काही महिन्यांत लाखो संदेश पाठवले हे पाहून मला खूप बरे वाटले. मन की बात रेडिओ कार्यक्रम काही महिन्यांसाठी बंद झाला असेल, पण मन की बातची भावना, देशात दररोज समाजात होणारी चांगली कामे, निस्वार्थ भावनेने केलेली कामे ज्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो, सतत चालू राहिली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्या तुमच्या लक्षात आल्या असतील.

    मान्सूनचा संदर्भ देत पंतप्रधा मोदी म्हणाले की, आता मान्सूनही आला आहे आणि मान्सून आला की मनही प्रसन्न होते. आज आपण पुन्हा एकदा अशा देशबांधवांची चर्चा करणार आहोत जे आपल्या कार्यातून समाजात बदल घडवून आणत आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात रेडिओ कार्यक्रमाच्या 111 व्या भागात म्हणाले, आज तो दिवस आला आहे ज्याची आपण सर्वजण फेब्रुवारीपासून वाट पाहत होतो. आज मी मन की बात घेऊन तुमच्यामध्ये पुन्हा उपस्थित आहे, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे असाल, घरातील सर्वांची तब्येत चांगली असेल.

    The first episode of PM Modis Mann Ki Baat after the Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!